शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गडचिरोलीत तिसऱ्याही दिवशी पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 19:05 IST

Gadchiroli News तीन दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गडचिराेली : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १२ जुलैदरम्यान रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस काेसळत हाेता. अगाेदरच ओसंडून वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली. संजय सराेवर, गाेसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गाेदावरी, प्राणहिता व वर्धा नदीसुद्धा उफाळून वाहत आहे. माेठ्या नद्या उफाळून वाहत असल्याने या नद्यांना लागून असलेल्या लहान नद्या व नाल्यांना दाब निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली.

काँग्रेसतर्फे मदत केंद्र

पुरामुळे जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य वाहून जाते. अशावेळी त्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागू नये, यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणार आहे. मदतीकरिता नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अनुप कोहळे यांच्याशी संपर्क साधावा. गडचिराेली तालुक्यातील नागरिकांनी रजनीकांत मोटघरे, गौरव एनपरेड्डीवार, मयूर गावतुरे, सिराेंचा तालुक्यातील आकाश परसा, एटापल्ली तालुक्यातील मोहन नामेवार, निजान पेंदाम, भामरागड तालुक्यातील लक्ष्मीकांत बोगामी, अहेरी तालुका - पप्पू हकीम, रज्जाक पठाण, मूलचेरा तालुका - रवींद्र शहा, गोपाल कविराज, चामोर्शी तालुका - प्रमोद भगत, वैभव भिवापुरे, धानोरा तालुका - ललित बरचा, प्रशांत कोराम, आरमोरी तालुका - मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, देसाईगंज तालुका - राजेंद्र बुल्ले, पिंकू बावणे, कुरखेडा तालुका - जीवन पा. नाट, शोएब मस्तान तसेच कोरची तालुक्यातील मनोज अग्रवाल यांच्याशी संपर्क करावा.

सिराेंचा, भामरागड मार्ग झाले खुले

आलापल्ली-भामरागड नाल्यावरील पेरमिली नाला, कुमरगुडा नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग रविवारी बंद हाेते. मात्र साेमवारी हे मार्ग सुरू झाले आहेत. या दाेन्ही नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. आलापल्ली-सिराेंचा मार्गसुद्धा माेकळा झाला आहे.

३५ घरे पडली

अहेरी, एटापल्ली, सिराेंचा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक जिवित व वित्त हानी झाली आहे. या तालुक्यातील ३५ घरांची पडझड झाली आहे. १२ माेठी जनावरे वाहून गेली आहेत.

टॅग्स :floodपूर