शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गडचिरोलीत तिसऱ्याही दिवशी पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 19:05 IST

Gadchiroli News तीन दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गडचिराेली : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १२ जुलैदरम्यान रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस काेसळत हाेता. अगाेदरच ओसंडून वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली. संजय सराेवर, गाेसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गाेदावरी, प्राणहिता व वर्धा नदीसुद्धा उफाळून वाहत आहे. माेठ्या नद्या उफाळून वाहत असल्याने या नद्यांना लागून असलेल्या लहान नद्या व नाल्यांना दाब निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली.

काँग्रेसतर्फे मदत केंद्र

पुरामुळे जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य वाहून जाते. अशावेळी त्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागू नये, यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणार आहे. मदतीकरिता नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अनुप कोहळे यांच्याशी संपर्क साधावा. गडचिराेली तालुक्यातील नागरिकांनी रजनीकांत मोटघरे, गौरव एनपरेड्डीवार, मयूर गावतुरे, सिराेंचा तालुक्यातील आकाश परसा, एटापल्ली तालुक्यातील मोहन नामेवार, निजान पेंदाम, भामरागड तालुक्यातील लक्ष्मीकांत बोगामी, अहेरी तालुका - पप्पू हकीम, रज्जाक पठाण, मूलचेरा तालुका - रवींद्र शहा, गोपाल कविराज, चामोर्शी तालुका - प्रमोद भगत, वैभव भिवापुरे, धानोरा तालुका - ललित बरचा, प्रशांत कोराम, आरमोरी तालुका - मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, देसाईगंज तालुका - राजेंद्र बुल्ले, पिंकू बावणे, कुरखेडा तालुका - जीवन पा. नाट, शोएब मस्तान तसेच कोरची तालुक्यातील मनोज अग्रवाल यांच्याशी संपर्क करावा.

सिराेंचा, भामरागड मार्ग झाले खुले

आलापल्ली-भामरागड नाल्यावरील पेरमिली नाला, कुमरगुडा नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग रविवारी बंद हाेते. मात्र साेमवारी हे मार्ग सुरू झाले आहेत. या दाेन्ही नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. आलापल्ली-सिराेंचा मार्गसुद्धा माेकळा झाला आहे.

३५ घरे पडली

अहेरी, एटापल्ली, सिराेंचा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक जिवित व वित्त हानी झाली आहे. या तालुक्यातील ३५ घरांची पडझड झाली आहे. १२ माेठी जनावरे वाहून गेली आहेत.

टॅग्स :floodपूर