शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

गडचिरोलीत तिसऱ्याही दिवशी पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 19:05 IST

Gadchiroli News तीन दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गडचिराेली : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १२ जुलैदरम्यान रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस काेसळत हाेता. अगाेदरच ओसंडून वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली. संजय सराेवर, गाेसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गाेदावरी, प्राणहिता व वर्धा नदीसुद्धा उफाळून वाहत आहे. माेठ्या नद्या उफाळून वाहत असल्याने या नद्यांना लागून असलेल्या लहान नद्या व नाल्यांना दाब निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली.

काँग्रेसतर्फे मदत केंद्र

पुरामुळे जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य वाहून जाते. अशावेळी त्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागू नये, यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणार आहे. मदतीकरिता नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अनुप कोहळे यांच्याशी संपर्क साधावा. गडचिराेली तालुक्यातील नागरिकांनी रजनीकांत मोटघरे, गौरव एनपरेड्डीवार, मयूर गावतुरे, सिराेंचा तालुक्यातील आकाश परसा, एटापल्ली तालुक्यातील मोहन नामेवार, निजान पेंदाम, भामरागड तालुक्यातील लक्ष्मीकांत बोगामी, अहेरी तालुका - पप्पू हकीम, रज्जाक पठाण, मूलचेरा तालुका - रवींद्र शहा, गोपाल कविराज, चामोर्शी तालुका - प्रमोद भगत, वैभव भिवापुरे, धानोरा तालुका - ललित बरचा, प्रशांत कोराम, आरमोरी तालुका - मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, देसाईगंज तालुका - राजेंद्र बुल्ले, पिंकू बावणे, कुरखेडा तालुका - जीवन पा. नाट, शोएब मस्तान तसेच कोरची तालुक्यातील मनोज अग्रवाल यांच्याशी संपर्क करावा.

सिराेंचा, भामरागड मार्ग झाले खुले

आलापल्ली-भामरागड नाल्यावरील पेरमिली नाला, कुमरगुडा नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग रविवारी बंद हाेते. मात्र साेमवारी हे मार्ग सुरू झाले आहेत. या दाेन्ही नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. आलापल्ली-सिराेंचा मार्गसुद्धा माेकळा झाला आहे.

३५ घरे पडली

अहेरी, एटापल्ली, सिराेंचा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक जिवित व वित्त हानी झाली आहे. या तालुक्यातील ३५ घरांची पडझड झाली आहे. १२ माेठी जनावरे वाहून गेली आहेत.

टॅग्स :floodपूर