शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून तिघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 11:36 IST

गडचिरोलीमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी मंगळवारी (22 जानेवारी) तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळले.

ठळक मुद्देगडचिरोलीमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळले.प्रिलमध्ये पोलिसांनी कसनसुर चकमकीत 40 नक्षलवाद्यांना मारल्याचा घटनेचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली.

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी मंगळवारी (22 जानेवारी) तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळले. एप्रिलमध्ये पोलिसांनी कसनसुर चकमकीत 40 नक्षलवाद्यांना मारल्याचा घटनेचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली. जवळच नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमिटीच्या वतीने एक बॅनर लावण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळील कसनासूर गावात काही नक्षलवादी गेले. त्यांनी ग्रामस्थांना शस्त्रांचा धाक दाखवून गावाबाहेर काढले. तसेच पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तीन ग्रामस्थांची निर्घृणपणे हत्या केली. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहेत. छत्तीसगडमधून आलेल्या 100 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी गावातील 6 लोकांना शुक्रवारी रात्री गावातून हात बांधून नेले होते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवल्यानंतर काल रात्री त्यापैकी तिघांना सोडण्यात आले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत असून सर्व गावकरी पोलीस ठाण्यात आश्रयाला आले आहेत.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी