शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गडचिरोलीत गरजेच्या ठिकाणीच शिवभोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील शेकडो रुग्ण भरती राहतात. सोबतच त्यांचे नातेवाईक सुद्धा येतात. रुग्णाला रुग्णालयामार्फत भोजन पुरविले जाते. मात्र त्याच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकाची अडचण राहते. १०० रुपये खर्च करून तो एकवेळचे जेवण करू शकत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी त्याला उपाशी राहावे लागते.

ठळक मुद्देकेंद्राचे ठिकाण बदलविणे गरजेचे : लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गरजवंताला शिवभोजन मिळावे, या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने अवघ्या १० रुपयात जेवण देणारी शिवभोजन योजना सुरू केली. मात्र गडचिरोली येथील शिवभोजनाचे केंद्र योग्य ठिकाणी नसल्याने गरजू व्यक्ती शिवभोजनापासून वंचित राहात आहेत. उलट स्वस्त मिळते म्हणून दर दिवशी शिवभोजनाचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील शेकडो रुग्ण भरती राहतात. सोबतच त्यांचे नातेवाईक सुद्धा येतात. रुग्णाला रुग्णालयामार्फत भोजन पुरविले जाते. मात्र त्याच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकाची अडचण राहते. १०० रुपये खर्च करून तो एकवेळचे जेवण करू शकत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी त्याला उपाशी राहावे लागते.अशाच गरजवंतांसाठी राज्य शासनाने शिवभोजन ही योजना सुरू केली आहे. मात्र गडचिरोली येथील शिवभोजनाचे केंद्र मुख्य बाजारपेठ असलेल्या चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाºया नागरिकाला सदर केंद्र कुठे आहे, याची माहिती राहत नाही. त्यामुळे सेवा उपलब्ध असूनही माहिती नसल्याने उपासमारीची पाळी रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. तर दुसरीकडे शिवभोजनाचा लाभ चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये काम करीत असलेला नोकरवर्ग, दुकानदार व शिक्षणासाठी आलेले मुले येत असल्याचे दिसून येते.वास्तविक या नागरिकांना शिवभोजनाची फारशी गरज नाही. मात्र स्वस्त मिळते म्हणून शिवभोजनाचा आस्वाद घेतात. शिवभोजन कक्ष मुख्यत्वे जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा महिला व बाल रुग्णालयाच्या परिसरातच असणे आवश्यक आहे. तरच शिवभोजनाचा खरा उद्देश सफल होईल.त्यादृष्टीने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.शिवभोजन मिळतेय फक्त पाच रुपयातशिवभोजन यापूर्वी १० रुपयाला दिले जात होते. मात्र शासनाने १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीची किंमत पाच रुपये केली आहे. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत ५ रुपये दर कायम राहणार आहे. गडचिरोली येथील शिवभोजन केंद्राला दिवसभरात केवळ २०० थाळींची मर्यादा होते. लॉकडाऊन झाल्यापासून काही नागरिक अडले आहेत. त्यांना जेवनाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शिवभोजन केंद्रांची मर्यादा दरदिवशी एक लाख थाळीपर्यंत वाढविली आहे.परवानगी दिल्यास रुग्णालयातही व्यवस्था करूज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी दिली आहे, त्या ठिकाणावरून दुसºया ठिकाणी भोजन वितरित करायचे असेल तर त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयात निश्चितच शिवभोजनाची गरज आहे. त्या ठिकाणी शिवभोजन देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून परवानगी मागितली जाईल. त्यांच्या परवानगीनंतर भोजनाचे वितरण केले जाईल, अशी माहिती शिवभोजन केंद्र चालविणाºया संजीवनी बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय