शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

गडचिरोलीत मुसळधार पाऊस -वीज पडून ४३ शेळ्या ठार

By admin | Updated: May 16, 2015 01:55 IST

गडचिरोली मुख्यालयासह जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी २ नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

तीन लाखांचे नुकसान : मारोडा गावात कळपावर वज्राघातगडचिरोली/चामोर्शी : गडचिरोली मुख्यालयासह जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी २ नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर चामोशी मुख्यालयापासून नऊ किमी अंतरावर असलेल्या मारोडा गावात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज पडून ४३ शेळ्या-मेंढ्या दगावल्याची घटना घडली. या घटनेत २० शेळ्या जखमी झाल्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी गावातील कामरा राजन्ना निलावार हे आपल्या मालकीच्या शेळ्या-मेंढ्या घेऊन उमाजी माधव मोहुर्ले यांच्या शेतात थांबलेले होते. दरम्यान अचानक शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली. यात ४३ शेळ्या-मेंढ्या दगावल्या. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार एम. जी. वैद्य, सहायक पोलीस निरिक्षक हुर्रे, मारोडाचे सरपंच घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मृत शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोवाची, डॉ. देवकुळे, डॉ. खाडे, डॉ. सरकार, डॉ. नैताम यांच्या चमुने मृत शेळ्या-मेंढ्यांवर शवविच्छेदन केले. जखमी असलेल्या २० शेळ्यांवर औषधोपचार करण्यात आले. निलावार यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केली आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी दुपारपासून संततधार पाऊस झाला. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अधेमध्ये वादळी वाऱ्यासह काही भागात पाऊस झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने दुपारी दीड ते दोनच्या सुमारास संततधार पाऊस गडचिरोली शहरात झाला. त्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले. शहरातील रस्त्यालगत बसणाऱ्या विक्रेत्यांचीही पावसामुळे तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वादळाने झाडांच्या फांद्याही तुटल्या तर काही ठिकाणी फलक उडाले. पावसामुळे रस्त्यावरची वाहतुकीही खोळंबलेली होती. मे महिन्याच्या मध्यार्धात पाऊस आल्याने शेतकरी आता शेतीच्या कामाला लागेल. लग्नाचा तसेच वास्तू कार्यक्रमाचाही शुक्रवारी ठोक होता. त्यांचीही अकाली पावसामुळे तारांबळ उडाली. शहरातील वीज पुरवठाही दिवसा अनेकदा वादळी पावसामुळे खंडीत झाला. गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा रात्री व दिवसाही खंडीत होत आहे.