शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

गडचिरोलीच्या जंगलात यावर्षी ११ हजार वणव्यांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:59 IST

राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे.

- मनोज ताजने गडचिरोली : राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे. वनौपज गोळा करताना पालपाचोळा आणि सरपटणा-या प्राण्यांचा अडथळा दूर करण्यासाठी वनालगत राहणा-या नागरिकांकडून सदर आगी लावल्या जातात. आगींचे प्रमाण पाहता नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती कुचकामी ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १२ हजार ८६७ चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल पसरलेले आहे.रोजगाराची साधनं नसल्यामुळे जंगलालगत राहणारे लोक उन्हाळ्यात तेंदूपाने, मोहफूल व इतर वनौपज गोळा करून त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह करतात. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी तेंदूपानांचा हंगाम जोमाने सुरू असतो. पेसा कायद्याने गावालगतच्या जंगलातील वनसंपत्तीवर हक्क मिळालेल्या ग्रामसभा तेंदूपाने खरेदी करून बाहेरील कंत्राटदारांना विकतात. यातून कोट्यवधीची उलाढाल होते. तेंदूपाने गोळा करणे सोपे जावे म्हणून उन्हाळ्यात खाली पडणारा झाडांचा पालापाचोळा जाळण्यासाठी आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो किलोमीटरचा परिसर कवेत घेते. अनेक वेळा शेतक-यांकडून धु-यावर लावलेली आग पसरत जाऊन जंगलात पसरते. या आगीत मोठ्या वृक्षांची फारशी हाणी होत नसली तरी रोपटे, प्राण्यांना जीव गमवावा लागतो. क्षेत्र मोठे आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे आगीचे नियंत्रण अनेक वेळा हाताबाहेर जात आहे.

फायर लाईन व जनजागृतीवर मोठा खर्चजंगलात लावल्या जाणा-या आगी दूरपर्यंत न पसरता मर्यादित राहाव्यात यासाठी फायर ब्लोअरच्या मदतीने विशिष्ट रेषेत पालापाचोळा मोकळा करून फायर लाईन (जाळ रेषा) तयार केली जाते. त्यासाठी ७३५ वनक्षकांकडे फायर ब्लोअर हे यंत्र देण्यात आले आहे. त्यातून निघणा-या हवेच्या दाबाने पालापाचोळा साफ होऊन आग पसरण्यापासून रोखता येते. या यंत्राच्या वापरावर आणि आगी न लावण्याबाबत गावागावात जनजागृती करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्या तुलनेत आगीचे प्रमाण कमी करण्यात वनविभागाला अपेक्षित यश आलेले दिसत नाही.सॅटेलाईट अलर्टमुळे अहोरात्र कामआता जंगलात कुठेही आग लागल्यास सॅटेलाईट ती आग टिपून वन अधिकाºयांच्या मोबाईलवर सतत त्याचा संदेश येत असतो. त्यामुळे आग नेमकी कुठे लागली याची माहिती वनविभागाला लवकर मिळण्यास मदत होते. परंतू वनकर्मचारी तिथे पोहोचेपर्यंत आग बरीच पसरलेली असते. ज्या भागात आधीच फायर लाईन तयार केलेल्या आहेत त्या भागात आग मर्यादित स्वरूपात राहते.

 

कोट...गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. इतर जिल्ह्यांत एका वनरक्षकाकडे ५०० ते ८०० हेक्टरचा परिसर असताना या जिल्ह्यात एका वनरक्षकाला ११०० ते ४५०० हेक्टरचा परिसर सांभाळावा लागतो. बीट लहान करून वनरक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविला आहे.- एस.एल. बिलोलीकर, उपवनसंरक्षक (दक्षता)