शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या जंगलात यावर्षी ११ हजार वणव्यांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:59 IST

राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे.

- मनोज ताजने गडचिरोली : राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे. वनौपज गोळा करताना पालपाचोळा आणि सरपटणा-या प्राण्यांचा अडथळा दूर करण्यासाठी वनालगत राहणा-या नागरिकांकडून सदर आगी लावल्या जातात. आगींचे प्रमाण पाहता नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती कुचकामी ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १२ हजार ८६७ चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल पसरलेले आहे.रोजगाराची साधनं नसल्यामुळे जंगलालगत राहणारे लोक उन्हाळ्यात तेंदूपाने, मोहफूल व इतर वनौपज गोळा करून त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह करतात. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी तेंदूपानांचा हंगाम जोमाने सुरू असतो. पेसा कायद्याने गावालगतच्या जंगलातील वनसंपत्तीवर हक्क मिळालेल्या ग्रामसभा तेंदूपाने खरेदी करून बाहेरील कंत्राटदारांना विकतात. यातून कोट्यवधीची उलाढाल होते. तेंदूपाने गोळा करणे सोपे जावे म्हणून उन्हाळ्यात खाली पडणारा झाडांचा पालापाचोळा जाळण्यासाठी आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो किलोमीटरचा परिसर कवेत घेते. अनेक वेळा शेतक-यांकडून धु-यावर लावलेली आग पसरत जाऊन जंगलात पसरते. या आगीत मोठ्या वृक्षांची फारशी हाणी होत नसली तरी रोपटे, प्राण्यांना जीव गमवावा लागतो. क्षेत्र मोठे आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे आगीचे नियंत्रण अनेक वेळा हाताबाहेर जात आहे.

फायर लाईन व जनजागृतीवर मोठा खर्चजंगलात लावल्या जाणा-या आगी दूरपर्यंत न पसरता मर्यादित राहाव्यात यासाठी फायर ब्लोअरच्या मदतीने विशिष्ट रेषेत पालापाचोळा मोकळा करून फायर लाईन (जाळ रेषा) तयार केली जाते. त्यासाठी ७३५ वनक्षकांकडे फायर ब्लोअर हे यंत्र देण्यात आले आहे. त्यातून निघणा-या हवेच्या दाबाने पालापाचोळा साफ होऊन आग पसरण्यापासून रोखता येते. या यंत्राच्या वापरावर आणि आगी न लावण्याबाबत गावागावात जनजागृती करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्या तुलनेत आगीचे प्रमाण कमी करण्यात वनविभागाला अपेक्षित यश आलेले दिसत नाही.सॅटेलाईट अलर्टमुळे अहोरात्र कामआता जंगलात कुठेही आग लागल्यास सॅटेलाईट ती आग टिपून वन अधिकाºयांच्या मोबाईलवर सतत त्याचा संदेश येत असतो. त्यामुळे आग नेमकी कुठे लागली याची माहिती वनविभागाला लवकर मिळण्यास मदत होते. परंतू वनकर्मचारी तिथे पोहोचेपर्यंत आग बरीच पसरलेली असते. ज्या भागात आधीच फायर लाईन तयार केलेल्या आहेत त्या भागात आग मर्यादित स्वरूपात राहते.

 

कोट...गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. इतर जिल्ह्यांत एका वनरक्षकाकडे ५०० ते ८०० हेक्टरचा परिसर असताना या जिल्ह्यात एका वनरक्षकाला ११०० ते ४५०० हेक्टरचा परिसर सांभाळावा लागतो. बीट लहान करून वनरक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविला आहे.- एस.एल. बिलोलीकर, उपवनसंरक्षक (दक्षता)