शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

गडचिरोलीत वन विभागच साफ करणार मोहफुलाखालील पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 11:20 IST

मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटनांवर नियंत्रणाचा प्रयत्न ८०० ब्लोअर मशिन खरेदी करणार

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमागे मोहफूल वेचण्यासाठी पालपाचोळा जळावा म्हणून लावलेला मानवनिर्मिती वणवा कारणीभूत असल्याचे वनविभागाच्या अभ्यासात लक्षात आले. त्यामुळे आता आगी लावून पालापाचोळा जाळण्याऐवजी मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात आणखी ८०० ब्लोअर मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७६ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख १३ हजार ७१५ मोहाची झाडे आहेत. मोहफुलापासून विविध पदार्थ तयार करता येत असल्याने मोहफुलांना चांगली किंमत मिळते. विशेष म्हणजे, मोहफुलासाठी कोणतेही अतिरिक्त श्रम किंवा गुंतवणूक करावी लागत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात मोहफूल वेचण्याकडे नागरिकांचा कल असतो. मोहफूल जमिनीवर पडत असल्याने ते वेचावे लागतात. त्यासाठी पालापाचोळा साफ करणे गरजेचे असते. प्रत्येक झाडाखालील कचरा साफ करणे शक्य नसल्यामुळे लोक मोहाच्या झाडाखालील कचºयाला आग लावतात. ही आग पुढे जंगलात पसरून त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. यात जंगल व जैवविविधतेचे मोठे नुकसान होते.वन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक आगी मोहफूल वेचण्याच्या उद्देशाने लावण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये जंगलातील आगीच्या ११ हजार ७९६ घटनांची नोंद आहे. त्यामध्ये मोहफूल वेचण्यासाठी ६ हजार ७१८ आगी लागल्या आहेत.आगीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी वनविभाग आता ब्लोअर मशिनच्या सहाय्याने मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा स्वच्छ करून देणार आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाकडे सध्या ६८२ ब्लोअर मशिन आहेत. यावर्षी पुन्हा ८०० मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.

झाडाखाली जाळी लावण्याचा प्रयोग फसलाआगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षी वन विभागाने काही गावातील नागरिकांना जाळ्या वितरित केल्या होत्या. या जाळ्या जमिनीपासून जवळपास दोन फूट उंचीवर मोहाच्या झाडाखाली बांधल्या होत्या. दिवसभर पडलेले मोहफूल जाळीत जमा करून गोळा करावे लागत असे. त्यामुळे मोहफूल वेचण्याचीही गरज नव्हती. जाळीत मोहफूल पडल्याने स्वच्छ मोहफूल उपलब्ध होईल, हा सुध्दा उद्देश होता. मात्र बहुतांश नागरिकांनी जाळ्यांचा दुरूपयोग केला. तसेच जाळीमुळे एखाद्या वन्यजीवाचा जीव जाण्याचाही धोका होता. परिणामी जाळी वितरण यावर्षीपासून बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग