शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

गडचिरोलीत वन विभागच साफ करणार मोहफुलाखालील पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 11:20 IST

मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटनांवर नियंत्रणाचा प्रयत्न ८०० ब्लोअर मशिन खरेदी करणार

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमागे मोहफूल वेचण्यासाठी पालपाचोळा जळावा म्हणून लावलेला मानवनिर्मिती वणवा कारणीभूत असल्याचे वनविभागाच्या अभ्यासात लक्षात आले. त्यामुळे आता आगी लावून पालापाचोळा जाळण्याऐवजी मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात आणखी ८०० ब्लोअर मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७६ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख १३ हजार ७१५ मोहाची झाडे आहेत. मोहफुलापासून विविध पदार्थ तयार करता येत असल्याने मोहफुलांना चांगली किंमत मिळते. विशेष म्हणजे, मोहफुलासाठी कोणतेही अतिरिक्त श्रम किंवा गुंतवणूक करावी लागत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात मोहफूल वेचण्याकडे नागरिकांचा कल असतो. मोहफूल जमिनीवर पडत असल्याने ते वेचावे लागतात. त्यासाठी पालापाचोळा साफ करणे गरजेचे असते. प्रत्येक झाडाखालील कचरा साफ करणे शक्य नसल्यामुळे लोक मोहाच्या झाडाखालील कचºयाला आग लावतात. ही आग पुढे जंगलात पसरून त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. यात जंगल व जैवविविधतेचे मोठे नुकसान होते.वन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक आगी मोहफूल वेचण्याच्या उद्देशाने लावण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये जंगलातील आगीच्या ११ हजार ७९६ घटनांची नोंद आहे. त्यामध्ये मोहफूल वेचण्यासाठी ६ हजार ७१८ आगी लागल्या आहेत.आगीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी वनविभाग आता ब्लोअर मशिनच्या सहाय्याने मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा स्वच्छ करून देणार आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाकडे सध्या ६८२ ब्लोअर मशिन आहेत. यावर्षी पुन्हा ८०० मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.

झाडाखाली जाळी लावण्याचा प्रयोग फसलाआगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षी वन विभागाने काही गावातील नागरिकांना जाळ्या वितरित केल्या होत्या. या जाळ्या जमिनीपासून जवळपास दोन फूट उंचीवर मोहाच्या झाडाखाली बांधल्या होत्या. दिवसभर पडलेले मोहफूल जाळीत जमा करून गोळा करावे लागत असे. त्यामुळे मोहफूल वेचण्याचीही गरज नव्हती. जाळीत मोहफूल पडल्याने स्वच्छ मोहफूल उपलब्ध होईल, हा सुध्दा उद्देश होता. मात्र बहुतांश नागरिकांनी जाळ्यांचा दुरूपयोग केला. तसेच जाळीमुळे एखाद्या वन्यजीवाचा जीव जाण्याचाही धोका होता. परिणामी जाळी वितरण यावर्षीपासून बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग