शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गडचिरोलीत अवघ्या सहा दिवसात आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 19:09 IST

दि. १८ ते २३ या ६ दिवसात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यापैकी बहुतांश लोक वेगवेगळ्या आजारांनी पीडित होते. दरम्यान पुन्हा ८५ पॉझिटिव्हची भर पडल्याने एकूण बाधित लोकांची संख्या आता २१७१ झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा असाही कहर ८५ नवीन बाधितांची नोंद तर ३६ जण कोरानामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दि. १८ ते २३ या ६ दिवसात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यापैकी बहुतांश लोक वेगवेगळ्या आजारांनी पीडित होते. दरम्यान पुन्हा ८५ पॉझिटिव्हची भर पडल्याने एकूण बाधित लोकांची संख्या आता २१७१ झाली आहे.नवीन ८५ बाधितांमध्ये गडचिरोलीमधील २४ जण आहेत. त्यात नेहरू वॉर्डमधील १, गोगाव १, गडचिरोली ५, जिल्हा परिषदेतील ७ कर्मचारी, एसआरपीएफ १, रामपुरी १, हनुमान वॉर्ड १, कारगिल चौक १, नवेगाव १, नागभीडवरून आलेला १, वनश्री कॉलनी १, नंदनवनघर १, रामनगर १ यांचा समावेश आहे.

एटापल्ली तालुक्यातील ३ जणांमध्ये बुर्गी गावातील १, जारावंडी २ जणांचा समावेश आहे.कोरचीमध्ये स्थानिक ३ कोरोनाबाधित आढळले. देसाईगंजमध्ये बुधवारी १३ बाधित आढळले. त्यात राजेंद्र वॉर्ड १, सीआरपीएफ २, सावंगी १, कोंढाळा १, कोकडी १, कुरूड २, माता वॉर्ड १, हनुमान वॉर्ड १, आंबेडकर वॉर्ड १, विसोरा १, वडसा १ यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील १२ जणांमध्ये स्थानिक ६ व देऊळगावच्या ६ जणांचा समावेश आहे.चामोर्शी तालुक्यातील १० जणांमध्ये आष्टी २, चामोर्शी ४, आमगाव २ घारगाव १, डोंगरगाव १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा सुंदरनगर येथील १ जण बाधित आढळला.धानोरा तालुक्यातील ४ जणांमध्ये स्थानिक २ व चातगाव २, अहेरी येथील ८ जणांमध्ये महागाव ५, अहेरी शहर २, जिमलगट्टा १ यांचा समावेश आहे. सिरोंचातील ७ जणांमध्ये वॉर्ड नं. ३ मध्ये १, वॉर्ड नं. ७ मध्ये ३, वॉर्ड नं. ६ मध्ये ३ जण बाधित आढळले. तसेच कुरखेडामधील १ जण पॉझिटिव्ह आढळला आहे.

एकूण क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ३६ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये अहेरी २, आरमोरी ५, चामोर्शी ३, धानोरा २, गडचिरोली १९, मुलचेरा १, सिरोंचा ३ व देसाईगंज येथील एका जणाचा समावेश आहे.

पुन्हा वाढली क्रियाशील रुग्णांची संख्याबुधवारी मृत्यू झालेली व्यक्ती गडचिरोलीच्या विवेकानंदनगरातील ५५ वर्षीय पुरूष आहे. ते हायपर टेन्शन आणि डायबेटिक (मधुमेहग्रस्त) होते. ३६ जण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ५३८ झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित २१७१ रूग्णांपैकी १६१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस