शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गडचिरोली विभागात एसटीचे ३० कोटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:57 IST

गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यांतर्गत वाहतुकीला प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला सुरूवात होऊन अडीच महिने झाले, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने एसटीच्या अजूनही मोजक्याच फेऱ्या धावत आहेत. त्यामुळे दिवसागणिक एसटीच्या तोट्यात भर पडत आहे. गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

२२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासून ३ मे पर्यंत बससेवा पूर्णपणे बंद होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ४ मे पासून गडचिरोली जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र अजुनही बसला प्रवासी मिळत नसल्याने बहुतांश मार्गांवरील बसफेऱ्या बंदच आहेत. काही मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र त्यांच्यामध्ये केवळ ३० ते ४० टक्के भारमान मिळत आहे. परिणामी एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सोडल्या जात आहेत.

सामान्य परिस्थितीत गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी आगार मिळून एसटीला दरदिवशी ३ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र लॉकडाऊनपासून या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. मार्च महिन्यात ३ कोटी ७ लाख, एप्रिल महिन्यात १० कोटी ५१ लाख, मे महिन्यात ८ कोटी ३४ लाख, जून महिन्यात ७ कोटी ७५ लाख असे एकूण २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र बसेस बंद असल्याने हे उत्पन्न आले नाही.

३ कोटी रुपयांची उधारीगडचिरोली विभागातील ३ आगारांमध्ये महिन्याला १० कोटींचे उत्पन्न बुडत असताना दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च मात्र सुरूच आहे. त्यामुळे एसटीचा तोटा गंभीर स्वरूप धारण करीत आहे. ३ कोटी १० लाख रुपयांची उधारी शिल्लक आहे. यामध्ये डिझेलचे ६१ लाख, एलआयसीचे २४ लाख, एसटी बँकचे १ कोटी १२ लाख आदींचा समावेश आहे. व्यवहार सुरू होऊन एसटीला प्रवासी मिळेल तेव्हाच परिस्थिती सुधारू शकते.

टॅग्स :state transportएसटी