शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना रोजगार देण्यात गडचिरोली जिल्हा दुसरा

By admin | Updated: March 21, 2017 00:43 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २९४ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात विविध कामे सुरू असून ...

मजूर उपस्थितीत दुसरा क्रमांक : रोहयोची १ हजार ३१८ कामे सुरूगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २९४ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात विविध कामे सुरू असून या कामांवर आजघडीस ४६ हजार २७७ मजूर उपस्थिती आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास गडचिरोली जिल्ह्यात नरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून मजूर उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. मजूर उपस्थितीत पहिल्या क्रमांकावर गोंदिया असून तिसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्हा आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर विविध प्रकारची कामे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, बोडी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, शौचालय, नाडेप, घरकूल, गुरांचा गोठा, वृक्ष लागवड, पिण्याच्या पाण्याची विहीर आदी कामांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण ४५६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी २९४ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रोहयोची एकूण १ हजार ३१८ कामे सुरू आहेत. नरेगा कायद्यान्वये प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याचे बंधनकारक आहे. या संदर्भात राज्य शासनाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला सक्त निर्देश आहेत. रोहयोंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करून उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेंतर्गत रोहयो कामाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करून त्यानुसार रोहयोची कामे केली जातात.कुरखेडा तालुका आघाडीवररोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करून जास्तीतजास्त मजुरांना रोजगार देण्यात कुरखेडा तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक १० हजार ७३६ मजुरांना सद्य:स्थितीत रोहयोतून रोजगार मिळाला आहे.ग्रामसेवकांच्या संपाचाही परिणामगतवर्षी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर मार्च महिन्यात जवळपास ६० हजार मजूर उपस्थिती होती. मात्र यावर्षी नेमक्या याच कालावधीत ग्रामसेवकांनी संप पुकारल्यामुळे रोहयो कामे प्रभावित झाली. परिणामी प्रभावी जनजागृतीअभावी गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातील रोहयो कामावरील मजूर उपस्थिती कमी आहे. ६० हजार वर मजूर उपस्थिती ठेवण्याचे जि.प. नरेगा विभागाचे नियोजन होते. मात्र गावपातळीवर सदर नियोजन काही प्रमाणात अयशस्वी झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांना रोजगार देण्यात महाराष्ट्रातील हिंगोली, जालना, रायगड, उस्मानाबाद, कोल्हापूर आदी जिल्हे यंदा प्रचंड माघारले असल्याचे दिसून येत आहे.