शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्याच्या पेसातील निवृत्त शिक्षक भरतीचे 'वांधे'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:50 IST

दुर्गम-अतिदुर्गम भागात द्यावी लागणार सेवा : जिल्ह्यात ५८८ जागा, अर्ज केवळ १४३

दिलीप दहेलकरलोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या 'पेसा' क्षेत्रातील शिक्षक भरती शिक्षण सेवकाऐवजी कंत्राटी पद्धतीने महिनाभरात भरावीत, असे निर्देश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील शाळांमधील रिक्त ५८५ जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, केवळ १४३ अर्ज आले आहेत. 

जि. प. प्रशासनाने यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविले, मात्र रिक्त जागांच्या तुलनेत अत्यल्प अर्ज प्राप्त झाले आहे. त्यातच मानधनावर दुर्गम भागात सेवा द्यावी लागणार असल्याने बहुतांश सेवानिवृत्त शिक्षक यासाठी तयार नाहीत. याशिवाय वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. एकूणच जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक भरतीचे 'वांधे' झाले असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली आहे.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 'पेसा' क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. 

या भरती प्रक्रियेत सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास नव्याने निवड प्राप्त उमेदवाराला दरमहा २० हजार रुपयांचे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असणार आहेत.

संघटनांचा भरतीला विरोध कायमशासनाच्या आदेशानुसार, निवृत्त शिक्षकांना पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर नियुक्त करण्याची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले अशा शाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा बेरोजगार उमेदवारांच्या संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.

जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे - ७००पेसा क्षेत्रात रिक्त पदे - ५८८एकूण अर्ज प्राप्त - १४३

या जिल्ह्यांत सुरू आहे सेवानिवृत्त शिक्षक भरती प्रक्रिया पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम १९९६ (पैसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्याअंतर्गत राज्यातील गडचिरोली, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर व या जिल्ह्यांना पेसा हा कायदा लागू आहे. या जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या शाळांमधील रिक्त पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून तात्पुरत्या स्वरूपात भरली जात आहे.

मूळ तालुक्यातून दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते नियुक्तीधानोरा तालुक्यात वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना अहेरी उपविभागात कोणत्याही तालुक्यात कोणत्याही शाळेत रिक्त असलेल्या जागांवर जि. प. प्रशासनाच्या वतीने नियुक्त्ती देण्यात येणार आहे. २० हजार रुपयांचे मानधनासाठी त्यांना स्वतःचे गाव व कुटुंबांपासून दूर जावे लागणार आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र मागविल्याने अडचणवयाचे ६० वर्ष पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शाळेत सेवा देण्याची संधी दिली जात आहे. यासाठी त्यांना महिन्याला २० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. मात्र अर्ज केलेल्या व इच्छुक शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वतीने फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक केले असल्याने शिक्षकांची मोठी गोची झाली आहे. कारण या वयामध्ये अनेक शिक्षकांना बीपी, शुगर, अस्थमा, लकवा, मणक्याचे आजार तसेच इतर कोणते ना कोणते आजार आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळणे कठीण आहे.

तालुकानिहाय प्राप्त अर्जतालुका                       अर्जधानोरा                           ०४सिरोंचा                           ०६गडचिरोली                      ३०एटापल्ली                       ०२आरमोरी                         २३देसाईगंज                        १६कुरखेडा                         ३५मुलचेरा                          ०५अहेरी                             १२

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली