शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

स्वच्छतेत गडचिरोली शहर राज्यात शेवटून तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

२०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले.

ठळक मुद्देदेसाईगंज ३१ व्या स्थानावर : सर्व नगर पंचायतींची स्थितीही लाजीरवाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ चा निकाल जाहीर केला आहे. त्यात गडचिरोली शहराने राज्यातून सर्वात शेवटून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. देसाईगंज शहराची स्थिती थोडी चांगली आहे. या शहराने १०७ शहरांपैकी ३१ वा क्रमांक पटकाविला आहे.शहरी भागात स्वच्छता राहावी यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाते. या निधीचा उपयोग करून स्वच्छतेचे विविध उपक्रम शहरात राबवायचे असतात. त्यानंतर बाह्य समितीकडून पाहणी केली जाते. २०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले. यावरून शहरातील स्वच्छतेचा अंदाज येण्यास मदत होते. राज्यातील इतर शहरे स्वच्छतेत देशात आघाडीवर असताना गडचिरोली शहराने शेवटून तिसरे स्थान पटकाविणे ही बाब शहरवासियांसाठी लाजीरवाणी ठरत आहे.नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यास गडचिरोली नगर परिषद अपयशी ठरली असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दरवर्षी स्वच्छतेत गडचिरोली शहर माघारत चालले आहे. गडचिरोली शहराने स्वच्छतेबाबतचे नियोजन करून पुढील वर्षी स्वच्छतेत चांगले स्थान मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.२५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देसाईगंज शहर सहभागी झाले होते. या गटात राज्यातील एकूण १०७ शहरे सहभागी झाली होती. त्यात देसाईगंज नगर परिषदेने ३१ वा क्रमांक पटकाविला आहे. या शहराने पहिल्या दहामध्ये स्थान पटकाविले नसले तरी गडचिरोली शहरापेक्षा या शहराची स्थिती थोडी चांगली असल्याचे दिसून येते.मुलचेराला राज्यातून शेवटचा क्रमांक२५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद व सर्व नगर पंचायतींचा समावेश होता. या गटात राज्यभरातून १८६ शहरे सहभागी झाली होती. त्यात मुलचेरा नगर पंचायतीला सर्वात शेवटचा १८६ वा क्रमांक मिळाला आहे. सिरोंचा नगर पंचायतीला १८५, अहेरी १८३, एटापल्ली १७६, भामरागड १६८, चामोर्शी १५७, कुरखेडा १२२,धानोरा ११७, आरमोरी ११० तर कोरचीने ४० वा क्रमांक पटकाविला आहे. सर्वच नगर पंचायतींना १०० च्या वरचे स्थान मिळाले आहे. मात्र कोरचीने ४० वे स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यातील इतर नगर पंचायतींनी कोरची नगर पंचायतीकडून स्वच्छतेचे धडे घेण्याची गरज आहे, जेणेकरून पुढील वर्षी किमान ५० मध्ये स्थान पटकाविता येईल.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान