शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

स्वच्छतेत गडचिरोली शहर राज्यात शेवटून तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

२०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले.

ठळक मुद्देदेसाईगंज ३१ व्या स्थानावर : सर्व नगर पंचायतींची स्थितीही लाजीरवाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ चा निकाल जाहीर केला आहे. त्यात गडचिरोली शहराने राज्यातून सर्वात शेवटून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. देसाईगंज शहराची स्थिती थोडी चांगली आहे. या शहराने १०७ शहरांपैकी ३१ वा क्रमांक पटकाविला आहे.शहरी भागात स्वच्छता राहावी यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाते. या निधीचा उपयोग करून स्वच्छतेचे विविध उपक्रम शहरात राबवायचे असतात. त्यानंतर बाह्य समितीकडून पाहणी केली जाते. २०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले. यावरून शहरातील स्वच्छतेचा अंदाज येण्यास मदत होते. राज्यातील इतर शहरे स्वच्छतेत देशात आघाडीवर असताना गडचिरोली शहराने शेवटून तिसरे स्थान पटकाविणे ही बाब शहरवासियांसाठी लाजीरवाणी ठरत आहे.नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यास गडचिरोली नगर परिषद अपयशी ठरली असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दरवर्षी स्वच्छतेत गडचिरोली शहर माघारत चालले आहे. गडचिरोली शहराने स्वच्छतेबाबतचे नियोजन करून पुढील वर्षी स्वच्छतेत चांगले स्थान मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.२५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देसाईगंज शहर सहभागी झाले होते. या गटात राज्यातील एकूण १०७ शहरे सहभागी झाली होती. त्यात देसाईगंज नगर परिषदेने ३१ वा क्रमांक पटकाविला आहे. या शहराने पहिल्या दहामध्ये स्थान पटकाविले नसले तरी गडचिरोली शहरापेक्षा या शहराची स्थिती थोडी चांगली असल्याचे दिसून येते.मुलचेराला राज्यातून शेवटचा क्रमांक२५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद व सर्व नगर पंचायतींचा समावेश होता. या गटात राज्यभरातून १८६ शहरे सहभागी झाली होती. त्यात मुलचेरा नगर पंचायतीला सर्वात शेवटचा १८६ वा क्रमांक मिळाला आहे. सिरोंचा नगर पंचायतीला १८५, अहेरी १८३, एटापल्ली १७६, भामरागड १६८, चामोर्शी १५७, कुरखेडा १२२,धानोरा ११७, आरमोरी ११० तर कोरचीने ४० वा क्रमांक पटकाविला आहे. सर्वच नगर पंचायतींना १०० च्या वरचे स्थान मिळाले आहे. मात्र कोरचीने ४० वे स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यातील इतर नगर पंचायतींनी कोरची नगर पंचायतीकडून स्वच्छतेचे धडे घेण्याची गरज आहे, जेणेकरून पुढील वर्षी किमान ५० मध्ये स्थान पटकाविता येईल.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान