शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत गडचिरोली शहर राज्यात शेवटून तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

२०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले.

ठळक मुद्देदेसाईगंज ३१ व्या स्थानावर : सर्व नगर पंचायतींची स्थितीही लाजीरवाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ चा निकाल जाहीर केला आहे. त्यात गडचिरोली शहराने राज्यातून सर्वात शेवटून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. देसाईगंज शहराची स्थिती थोडी चांगली आहे. या शहराने १०७ शहरांपैकी ३१ वा क्रमांक पटकाविला आहे.शहरी भागात स्वच्छता राहावी यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाते. या निधीचा उपयोग करून स्वच्छतेचे विविध उपक्रम शहरात राबवायचे असतात. त्यानंतर बाह्य समितीकडून पाहणी केली जाते. २०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले. यावरून शहरातील स्वच्छतेचा अंदाज येण्यास मदत होते. राज्यातील इतर शहरे स्वच्छतेत देशात आघाडीवर असताना गडचिरोली शहराने शेवटून तिसरे स्थान पटकाविणे ही बाब शहरवासियांसाठी लाजीरवाणी ठरत आहे.नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यास गडचिरोली नगर परिषद अपयशी ठरली असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दरवर्षी स्वच्छतेत गडचिरोली शहर माघारत चालले आहे. गडचिरोली शहराने स्वच्छतेबाबतचे नियोजन करून पुढील वर्षी स्वच्छतेत चांगले स्थान मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.२५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देसाईगंज शहर सहभागी झाले होते. या गटात राज्यातील एकूण १०७ शहरे सहभागी झाली होती. त्यात देसाईगंज नगर परिषदेने ३१ वा क्रमांक पटकाविला आहे. या शहराने पहिल्या दहामध्ये स्थान पटकाविले नसले तरी गडचिरोली शहरापेक्षा या शहराची स्थिती थोडी चांगली असल्याचे दिसून येते.मुलचेराला राज्यातून शेवटचा क्रमांक२५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद व सर्व नगर पंचायतींचा समावेश होता. या गटात राज्यभरातून १८६ शहरे सहभागी झाली होती. त्यात मुलचेरा नगर पंचायतीला सर्वात शेवटचा १८६ वा क्रमांक मिळाला आहे. सिरोंचा नगर पंचायतीला १८५, अहेरी १८३, एटापल्ली १७६, भामरागड १६८, चामोर्शी १५७, कुरखेडा १२२,धानोरा ११७, आरमोरी ११० तर कोरचीने ४० वा क्रमांक पटकाविला आहे. सर्वच नगर पंचायतींना १०० च्या वरचे स्थान मिळाले आहे. मात्र कोरचीने ४० वे स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यातील इतर नगर पंचायतींनी कोरची नगर पंचायतीकडून स्वच्छतेचे धडे घेण्याची गरज आहे, जेणेकरून पुढील वर्षी किमान ५० मध्ये स्थान पटकाविता येईल.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान