शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत हेल्मेटअभावी ३७ दुचाकीस्वारांची गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:51 IST

गडचिरोली जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.

ठळक मुद्दे ७ महिन्यात गडचिरोलीत ६३ अपघाती मृत्यू दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जानेवारी ते जुलै या ७ महिन्याच्या कालावधीत रस्ते अपघातात गडचिरोली जिल्ह्यात ६३ जणांनी प्राण गमावले. त्यातील ३७ मृत्यू हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्या सर्वांनी हेल्मेट घातलेले नव्हते हे विशेष. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचलेही असते. मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा मुद्दा गांभिर्याने घेत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करा, असे निर्देश दिले.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अपघातांविषयी आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांपैकी कोणत्याही व्यक्तीने डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. यापुढे दुचाकीस्वारांचे अपघात झाल्यास प्राणहाणी टाळता यावी म्हणून प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करण्याबाबत प्रक्रिया राबवा, त्यासाठी जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक व पोलीस विभागाला दिल्या.हेल्मेटसक्ती करताना सुरूवातीला एक महिना वाहनधारकांची जनजागृती केली जाईल. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, गडचिरोली वाहतूक शाखेच्या प्रभारी पुनम गोरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.जयंत पर्वते आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) गोरख गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघातजास्त वेगाने दुचाकी चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे ही या अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले. यापुढे प्रत्येक अपघाताचे सूक्ष्म विश्लेषण करून अहवाल तयार करावा, जेणेकरून त्यावरून ब्लॅक स्पॉट (वारंवार अपाघाताचे ठिकाण) ठरविण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविले. तसेच अपघातांच्या विश्लेषणावरून नेमक्या चुका कोणत्या आहेत व त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास करणे सोपे होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात