शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

गडचिरोलीत हेल्मेटअभावी ३७ दुचाकीस्वारांची गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:51 IST

गडचिरोली जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.

ठळक मुद्दे ७ महिन्यात गडचिरोलीत ६३ अपघाती मृत्यू दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जानेवारी ते जुलै या ७ महिन्याच्या कालावधीत रस्ते अपघातात गडचिरोली जिल्ह्यात ६३ जणांनी प्राण गमावले. त्यातील ३७ मृत्यू हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्या सर्वांनी हेल्मेट घातलेले नव्हते हे विशेष. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचलेही असते. मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा मुद्दा गांभिर्याने घेत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करा, असे निर्देश दिले.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अपघातांविषयी आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांपैकी कोणत्याही व्यक्तीने डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. यापुढे दुचाकीस्वारांचे अपघात झाल्यास प्राणहाणी टाळता यावी म्हणून प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करण्याबाबत प्रक्रिया राबवा, त्यासाठी जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक व पोलीस विभागाला दिल्या.हेल्मेटसक्ती करताना सुरूवातीला एक महिना वाहनधारकांची जनजागृती केली जाईल. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, गडचिरोली वाहतूक शाखेच्या प्रभारी पुनम गोरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.जयंत पर्वते आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) गोरख गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघातजास्त वेगाने दुचाकी चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे ही या अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले. यापुढे प्रत्येक अपघाताचे सूक्ष्म विश्लेषण करून अहवाल तयार करावा, जेणेकरून त्यावरून ब्लॅक स्पॉट (वारंवार अपाघाताचे ठिकाण) ठरविण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविले. तसेच अपघातांच्या विश्लेषणावरून नेमक्या चुका कोणत्या आहेत व त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास करणे सोपे होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात