शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चामाेर्शी महामार्गाच्या नियाेजनशून्य कामामुळे गडचिराेलीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST

गडचिराेली : गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून कासवगतीने सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून दाेन ते तीन ...

गडचिराेली : गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून कासवगतीने सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून दाेन ते तीन महिन्यांपासून हे काम प्रभावित झाले आहे. एका बाजूचा रस्ता पूर्णत: खाेदला असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेकांचे छाेटे-माेठे अपघात झाले असून, घाण पाण्याच्या डबक्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.

या महामार्गाचे काम सुरुवातीपासूनच नियाेजनबद्ध पद्धतीने केले जात नसल्याचे दिसून येते. शासकीय विज्ञान महाविद्यालय ते पाेस्ट ऑफिसपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या मार्गाचे काम गतीने व याेग्य प्रकारे हाेणे अपेक्षित हाेते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच बांधकाम करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी या सर्वांचे नियाेजन फेल झाले आहे. या महामार्गाच्या रखडलेल्या कामाप्रति अनेक राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही लाेकप्रतिनिधींनी या कामाची पाहणी करून त्याला गती देण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतरही कामाच्या पद्धतीत बदल झाला नाही.

एका बाजूने रस्ता खाेदून ठेवल्यामुळे त्या बाजूच्या लाइनमधील सर्व व्यावसायिक त्रस्त झाले असून, त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आरडाओरड झाल्यानंतर आवागमनासाठी बारीक चुरी टाकण्यात आली. मात्र या चुरीवरूनही दुचाकी वाहने जाऊ शकत नाहीत.

बाॅक्स....

गतीने काम सुरू करा अन्यथा आंदाेलन; शिवसेनेचा इशारा

- केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे एका बाजूचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहेत. यापूर्वीही या कामात सातत्य व नियमितपणा नव्हता. कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे गडचिराेलीकरांना प्रचंड त्रास हाेत आहे. केंद्र सरकार व कंत्राटदाराचे साटेलाेटे असल्याने या कामाला मुदतवाढ दिली जात आहे, असा आराेप करीत येत्या आठवडाभरात या मार्गाचे काम गतीने सुरू करावे, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील पाेरेड्डीवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

- यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. रस्त्याचे काम बंद असून, खाेदकामामुळे खड्ड्यातील पाणी व चिखल पायदळ जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे. या मार्गाचे काम रखडले असल्याने या मार्गावर अनेकदा वाहतूक प्रभावित हाेत आहे. या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा पाेरेड्डीवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.