शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

चामाेर्शी महामार्गाच्या नियाेजनशून्य कामामुळे गडचिराेलीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST

गडचिराेली : गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून कासवगतीने सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून दाेन ते तीन ...

गडचिराेली : गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून कासवगतीने सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून दाेन ते तीन महिन्यांपासून हे काम प्रभावित झाले आहे. एका बाजूचा रस्ता पूर्णत: खाेदला असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेकांचे छाेटे-माेठे अपघात झाले असून, घाण पाण्याच्या डबक्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.

या महामार्गाचे काम सुरुवातीपासूनच नियाेजनबद्ध पद्धतीने केले जात नसल्याचे दिसून येते. शासकीय विज्ञान महाविद्यालय ते पाेस्ट ऑफिसपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या मार्गाचे काम गतीने व याेग्य प्रकारे हाेणे अपेक्षित हाेते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच बांधकाम करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी या सर्वांचे नियाेजन फेल झाले आहे. या महामार्गाच्या रखडलेल्या कामाप्रति अनेक राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही लाेकप्रतिनिधींनी या कामाची पाहणी करून त्याला गती देण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतरही कामाच्या पद्धतीत बदल झाला नाही.

एका बाजूने रस्ता खाेदून ठेवल्यामुळे त्या बाजूच्या लाइनमधील सर्व व्यावसायिक त्रस्त झाले असून, त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आरडाओरड झाल्यानंतर आवागमनासाठी बारीक चुरी टाकण्यात आली. मात्र या चुरीवरूनही दुचाकी वाहने जाऊ शकत नाहीत.

बाॅक्स....

गतीने काम सुरू करा अन्यथा आंदाेलन; शिवसेनेचा इशारा

- केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे एका बाजूचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहेत. यापूर्वीही या कामात सातत्य व नियमितपणा नव्हता. कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे गडचिराेलीकरांना प्रचंड त्रास हाेत आहे. केंद्र सरकार व कंत्राटदाराचे साटेलाेटे असल्याने या कामाला मुदतवाढ दिली जात आहे, असा आराेप करीत येत्या आठवडाभरात या मार्गाचे काम गतीने सुरू करावे, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील पाेरेड्डीवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

- यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. रस्त्याचे काम बंद असून, खाेदकामामुळे खड्ड्यातील पाणी व चिखल पायदळ जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे. या मार्गाचे काम रखडले असल्याने या मार्गावर अनेकदा वाहतूक प्रभावित हाेत आहे. या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा पाेरेड्डीवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.