शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची खोटी लोकसंख्या दाखवून मिळविला निधी

By admin | Updated: December 20, 2014 01:38 IST

कुरखेडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत रामगडमध्ये सन २०१३-१४ व सन २०१४-१५ मध्ये ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत रामगड, वागदरा, जामटोला, गोवार हुडकी....

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत रामगडमध्ये सन २०१३-१४ व सन २०१४-१५ मध्ये ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत रामगड, वागदरा, जामटोला, गोवार हुडकी असे चार वेगवेगळे गाव दाखवून आदिवासींची लोकसंख्याही खोटी दर्शवून काम मंजूर करण्यात आले व या निधीत दुरूपयोग करण्यात आला. या प्रकरणी संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी रामगडच्या माजी सरपंच वच्छलाबाई केरामी यांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे केली आहेवच्छलाबाई केरामी यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांच्याकडून मंजूर कामाची व काम मंजुरीची माहिती आपण घेतली. यामध्ये रामगड गावची एकूण लोकसंख्या ७५० दाखविण्यात आली आहे. यामध्ये आदिवासींची लोकसंख्या ५१०, वागदराची लोकसंख्या १ हजार ४ व आदिवासींची लोकसंख्या ६५३, गोवारहुडकीची लोकसंख्या ७३० व आदिवासींची लोकसंख्या ५२०, जामटोलाची लोकसंख्या ५७० व आदिवासींची लोकसंख्या ५१५ दाखवून रामगड ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या या चार गावांना प्रत्येकी ७ लाख ५० हजाराचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र ग्रामपंचायत सचिवांकडे २७ आॅक्टोबर २०१४ ला माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, २००१ चे जनजगणेनुसार रामगड ग्रामपंचायत अंतर्गत रामगडची एकूण लोकसंख्या ७५० वागदराची एकूण लोकसंख्या १ हजार ४ व जामटोलाची एकूण लोकसंख्या २७० दाखविण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीची रामगडची लोकसंख्या २६२, आदिवासीची लोकसंख्या १३६ व ओबीसीची लोकसंख्या ३५२, वागदरची अनुसूचित जातीची लोकसंख्या ५२, आदिवासीची लोकसंख्या ६५३ व ओबीसीची लोकसंख्या २९९ दर्शविण्यात आली आहे. जामटोल्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या निरंक तर आदिवासीची लोकसंख्या २१५ व ओबीसीची २५५ लोकसंख्या दाखविण्यात आली आहे. म्हणजेच रामगड ग्रा.पं. अंतर्गत केवळ तीन महसुली गावे असताना ठक्करबाप्पा योजनेचा निधी मिळविण्याकरीता गोवारहुडकी याचा गाव नसतानाही गाव म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सदर प्रकरण हे शासनाची फसवणूक करणारे आहे. तसेच आदिवासीची लोकसंख्या रामगड ग्रा.पं. अंतर्गत २१५ असताना ५१५ ही खोटी लोकसंख्या दाखवून जास्त निधी रामगड गावासाठी मिळविण्यात आला. या निधी मंजुरीच्या प्रकरणात ग्रा.पं. सचिव, सरपंच, पं.स.चे शाखा अभियंता, संवर्ग विकास अधिकारी व प्रकल्प कार्यालयाचे मोक्का निरिक्षक या सर्वांनी मिळून खोटे अंदाजपत्रक व कागदपत्र तयार केलेत व शासकीय निधी आणून त्यात गैरप्रकार केला, असेही वच्छलाबाई केरामी यांनी म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केरामी यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)