शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

कडवी डावी विचारसरणीच्या ठिकाणी केंद्राकडून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:46 IST

गडचिरोलीला ३० कोटी; पायाभूत विकासासाठी विशेष साहाय्य निधी

- जमीर काझी मुंबई : डाव्या कडव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यातील मूलभूत व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय गृहविभागाने आता पुढाकार घेतला आहे. येथील विकासासाठी भरघोस निधी दिला जात असून, महाराष्टÑात गडचिरोली जिल्ह्याला या योजनेंतर्गत ३० कोटी मिळाले आहेत.केंद्राकडून आलेल्या निधीच्या वितरणासाठीच्या प्रस्तावाला गृहविभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यातून स्थानिक स्तरावर विविध विकास कामे केली जाणार आहेत. दुसऱ्या टप्पयात २१.६६ कोटी दिले जाणार आहेत, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.पावणेदोन वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे भीषण जातीय हिंसाचार झाला होता. त्यापूर्वी पुण्यात शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेतील चिथवणीखोर भाषणे कारणीभूत असल्याचा आणि हा सर्व कट डावी कट्टर विचारसरणी मानणारे नेते व नक्षलवादी चळवळीतून केला जात आहे, असा निष्कर्ष तपास यंत्रणाकडून काढण्यात आला. त्यानंतर, पुणे-मुंबईसह देशभरातील विविध ठिकाणांहून डावी विचारसरणी असलेले नेते, चळवळीतील कार्यकर्ते आणि विचारवंतावर कारवाई करण्यात आली. त्याबाबत सरकारच्या भूमिकेविषयी आरोप-प्रत्यरोप झाले असून, उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.दरम्यान, डावी कट्टर विचारसरणी असलेले, देशात विद्रोही शक्तीला, नक्षली कारवाईला प्रोत्साहन देत आहेत, त्यांच्यामुळे ग्रामीण नागरिकांमध्ये सरकारविरोधात द्वेष निर्माण केला जात आहे, असे केंद्रीय गृहविभागाच्या अहवालात नमूद केले आहे, त्यामुळे त्याला प्रतिबंधासाठी अशा भागात विशेष केंद्रीय साहाय्य देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत एकूण ५१.६६ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६० टक्के रक्कम म्हणजे ३० कोटी मंजूर झाले आहेत. उर्वरित ४० टक्के रक्कम आर्थिक वर्षाअखेरपर्यंत वितरित केली जाईल.निधीचा असा होणार वापरडाव्या कट्टर विचारसरणीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात विकासाबरोबरच पोलीस व सुरक्षा यंत्रणांसाठीआवश्यक सामग्री दिली जाईल, तसेच गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक सुविधांसाठी हा सर्व निधी केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खर्च करायचा आहे, तसेच ग्रामीण तरुण, तरुणी नक्षली चळवळीच्या प्रभावात येऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने खबरदारी घ्यायची आहे. शिक्षणाचा प्रसार, गावागावात शाळा, महाविद्यालयाची उभारायची आहेत.