शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

नक्षलवादाच्या बिमोडासाठी संपूर्ण सहकार्य

By admin | Updated: October 25, 2016 00:53 IST

नक्षलवादाचे फलीत शून्य आले असून याला चळवळ म्हणणाऱ्यांनी बाहेर पडून मुख्य प्रवाहात यावे, यासाठी मी आवाहन करतो, ..

हंसराज अहीर यांची ग्वाही : अग्निपंख उपक्रमांतर्गत मदतीचे वाटपअहेरी : नक्षलवादाचे फलीत शून्य आले असून याला चळवळ म्हणणाऱ्यांनी बाहेर पडून मुख्य प्रवाहात यावे, यासाठी मी आवाहन करतो, नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी रक्षामंत्रालय सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली तसेच आदर्श मित्र मंडळ व इतर स्वयंसेवी सामाजिक संस्थांतर्फे सोमवारी अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात आयोजित ‘अग्निपंख’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर आदिवासी विकास, वनराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सीआरपीएफ ९ व्या बटालियनचे उपकमांडर पवन कुमार, ३४ व्या बटालियनचे द्वितीय कमांडर जितेंद्र कुमार, अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप, श्रीलक्ष्मीनृसिंह पतसंस्था बल्लारपूरचे श्रीनिवास सुंचुवार, सेवा मित्र मंडळाचे मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ना. हंसराज अहीर म्हणाले, साधारणत: ३४ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात डाव्या विचारसरणीच्या नादी लागून अनेक युवक रक्तपात करीत आहेत. युवकांनी नक्षल चळवळ सोडून समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन राष्ट्राची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. गडचिरोलीत नक्षल बिमोडासाठी केंद्र सरकारतर्फे भरीव मदत देण्याची आपली भूमिका आहे. यासाठी रक्षामंत्रालय पूर्ण मदत करेल, तसेच अधिक साधने लागतील तर ती देखील पुरविल्या जातील, आदर्श मित्र मंडळ व इतर सामाजिक संस्थांनी राबविलेला सदर अग्निपंख उपक्रम अनुकरनीय आहे. नक्षल पीडितांच्या कुटुंबाला रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून दिलेली मदत अधिक मोलाची आहे. नक्षलवाद ही गडचिरोली जिल्ह्याची असलेली ओळख बदलली पाहिजे. पोलीस दल आपले काम करीत आहे. नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असेही ना. अहेरी यावेळी म्हणाले. सामाजिक कार्याच्या माध्यमातून गडचिरोलीची सकारात्मक ओळख निर्माण करणाऱ्या सामाजिक संस्थांचे कार्य उल्लेखनीय आहे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले. सकारात्मक विचार घेऊन नवी पिढी पुढे येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुले आता पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेऊन गडचिरोली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे आदर्श मित्र मंडळाचे सदस्य उदय जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी खा. अशोक नेते, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले तर आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार यांनी मानले. यावेळी बहुसंख्य नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)