शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

संतप्त पानठेलाचालकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:19 IST

अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन : धाडसत्र राबवून कारवाई बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाईच्या भितीपोटी गडचिरोली शहरातील पानठेले बंद ठेवण्यात आले आहेत. रोजगार हिरावलेल्या अन्यायग्रस्त पानठेलाधारकांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाच्या बॅनरखाली शेकडो पानठेलाधारकांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला.तहसीलदार दामोधर भोयर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या जप्तीच्या धाडसत्रामुळे पानठेलाधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पानठेले बंद असल्याने रोजगार बंद झाल्याने कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे असा प्रश्न पानठेला चालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व पानठेला चालकांच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असल्याने सदरची अन्यायग्रस्त कारवाई तत्काळ बंद करण्यात यावी, तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीला अधिन राहून पानठेलाधारकांना तत्काळ पानठेले सुरू करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुखासह शिवसेनेचे गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, ज्ञानेश्वर बगमारे, नंदू कुमरे, संतोष मारगोनवार, शेकापचे रामदास जराते, रोहिदास कुमरे तसेच दिलीप चांदेकर, संतोष चापले, सुनिल ब्राह्मणवाडे, सुरज उप्पलवार, साईनाथ अलोणे, अशोक लोणारे, हेमंत कोटगले, गजानन निकुरे, उमेश वंजारी, विनोद हुलके, शुभम देवलवार, बंडू निंबोरकर, दीपक बाबनवाडे, संजय रामटेके, नरेश भैसारे, अतीश जेल्लेवार, सुनिल कोंडावार, रामू झाडे, प्रभाकर शेंडे, नितीन कोतकोंडावार, शरद हेडाऊ, देवेंद्र बांबोळे, ऋषी उंदीरवाडे, सलीम पठाण, वसीम खान, आकाश चौधरी, अमोल चौधरी, वासुदेव मडावी, विठ्ठल किरमे, गिरीधर नैताम, सुनील मुळे आदीसह गडचिरोली शहरातील शेकडो पानठेलाधारक सहभागी झाले होते.याप्रसंगी रामदास जराते व इतर पदाधिकाºयांनी तहसीलदार भोयर यांच्याशी चर्चा करून पानठेलाधारकांवर ओढावलेल्या बेरोजगारीची समस्या प्रकर्षाने मांडली. यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी केली.न्याय न मिळाल्यास जिल्हा कचेरीवर मोर्चातंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीच्या अधिन राहून पानठेलाधारक आपला व्यवसाय करतील, कोणीही सुगंधीत तंबाखू विकणार नाही. त्यामुळे प्रशासनाने पानठेले सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास हजारो पानठेलाधारकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.