शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

फ्रिजवाल गाईप्रकरणी कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

मात्र २०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायब असताना आणि त्याबाबत पोलिसात तक्रारही झालेली असताना अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तक्रार देऊन १० दिवस लोटले असताना या गंभीर प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देतक्रार करूनही गुन्हा दाखल नाही : शेतकऱ्यांच्या नावावर फसवाफसवीचे प्रकरण गुन्हा थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय लष्कराच्या ४०० पेक्षा जास्त दुधाळू गाईं शेतकऱ्यांच्या नावावर आणून त्या आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीचा डाव ‘लोकमत’मुळे उधळला गेला आहे. मात्र २०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायब असताना आणि त्याबाबत पोलिसात तक्रारही झालेली असताना अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तक्रार देऊन १० दिवस लोटले असताना या गंभीर प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.सदर फसवणूक प्रकरणात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी गेल्या २६ डिसेंबर २०१९ रोजी आरमोरी पोलीस ठाण्यात प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने गाईंची अफरातफर केल्याबाबतची तक्रार दाखल केली. त्यात सदर कंपनीला ४२३ फ्रिजवाल गाई, कालवडी व वासरांसह कंपनीच्या पशुपालक सभासदांना वितरित करण्यासाठी दिल्या होत्या, मात्र कंपनीने ही जनावरे सभासदांना वितरित न करता आपल्याच ताब्यात अनधिकृतपणे ठेवल्या. याशिवाय त्या जनावरांची योग्य निगा न राखल्याने आणि योग्य व्यवस्थापनाअभावी बरीच जनावरे मरण पावली. दि.१९ डिसेंबरपर्यंत केवळ २६९ जनावरे शिल्लक होती. दरम्यान जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने ती जनावरे पशुपालकांना वितरित करण्यासाठी गेले असता १६३ जनावरांची (गायी) परस्पर विल्हेवाट लावल्याने (विक्री केल्याने) केवळ १०६ जनावरे शिल्लक होती.शासकीय मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे, अपहार करणे, पशुपालकांना वितवित करावयाच्या गाई स्वत:च्या अखत्यारित ठेवणे याकरिता सदर कंपनीच्या संचालक मंडळावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती उपायुक्तांनी आपल्या तक्रारीत केली आहे. परंतू प्रत्यक्षात त्या तक्रारीवर कारवाई झालेली नाही.प्रशासनावर कुणाचा दबाव?या प्रकरणात चक्क शासन आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अफरातफर करण्यात आल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकाºयांनी तडकाफडकी पोलीस कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार उपायुक्तांनी तक्रारही दाखल केली. मात्र तक्रार देऊन १० दिवस उलटले तरी अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात सदर कंपनीला वाचवण्यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी कारवाई का होत नाही, याचेही स्पष्ट उत्तर पोलीस किंवा प्रशासनाकडून दिले जात नाही.शेतकऱ्यांना गाई मिळणार का?सदर प्रकरणात पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) कार्यालयाने पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करून त्याचा अहवाल दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.महेश बन्सोडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आरमोरीजवळच्या शिवणीत जाऊन सदर कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यात झालेला घोळ स्पष्टपणे समोर आला. आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या गाई आल्या त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही. पशुसंवर्धन विभागाने देसाईगंज येथील वळूमाता संगोपन केंद्रावर ठेवलेल्या १०० फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना दिल्या जाणार का, याबद्दलही आता शंका व्यक्त होत आहे.या प्रकरणात जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार दि.२६ डिसेंबरला आरमोरी पोलीस ठाण्यात प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीविरूद्ध तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणाशी निगडित काही कागदपत्रांची मागणी पोलिसांनी केली होती. आमच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे त्यांना पुरविण्यात आली. मात्र कारवाई झालेली नाही. कंपनीने गायब केलेल्या गाईसुद्धा परत दिलेल्या नाही. पोलिसांनी कारवाई का केलेली नाही याबद्दल माहिती नाही. ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ‘रिसिव्ड कॉपी’सुद्धा मिळालेली नाही.- डॉ.वाय.एस. वंजारी,उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, गडचिरोली

टॅग्स :Farmerशेतकरी