शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

फ्रिजवाल गाईप्रकरणी कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

मात्र २०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायब असताना आणि त्याबाबत पोलिसात तक्रारही झालेली असताना अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तक्रार देऊन १० दिवस लोटले असताना या गंभीर प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देतक्रार करूनही गुन्हा दाखल नाही : शेतकऱ्यांच्या नावावर फसवाफसवीचे प्रकरण गुन्हा थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय लष्कराच्या ४०० पेक्षा जास्त दुधाळू गाईं शेतकऱ्यांच्या नावावर आणून त्या आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीचा डाव ‘लोकमत’मुळे उधळला गेला आहे. मात्र २०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायब असताना आणि त्याबाबत पोलिसात तक्रारही झालेली असताना अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तक्रार देऊन १० दिवस लोटले असताना या गंभीर प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.सदर फसवणूक प्रकरणात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी गेल्या २६ डिसेंबर २०१९ रोजी आरमोरी पोलीस ठाण्यात प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने गाईंची अफरातफर केल्याबाबतची तक्रार दाखल केली. त्यात सदर कंपनीला ४२३ फ्रिजवाल गाई, कालवडी व वासरांसह कंपनीच्या पशुपालक सभासदांना वितरित करण्यासाठी दिल्या होत्या, मात्र कंपनीने ही जनावरे सभासदांना वितरित न करता आपल्याच ताब्यात अनधिकृतपणे ठेवल्या. याशिवाय त्या जनावरांची योग्य निगा न राखल्याने आणि योग्य व्यवस्थापनाअभावी बरीच जनावरे मरण पावली. दि.१९ डिसेंबरपर्यंत केवळ २६९ जनावरे शिल्लक होती. दरम्यान जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने ती जनावरे पशुपालकांना वितरित करण्यासाठी गेले असता १६३ जनावरांची (गायी) परस्पर विल्हेवाट लावल्याने (विक्री केल्याने) केवळ १०६ जनावरे शिल्लक होती.शासकीय मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे, अपहार करणे, पशुपालकांना वितवित करावयाच्या गाई स्वत:च्या अखत्यारित ठेवणे याकरिता सदर कंपनीच्या संचालक मंडळावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती उपायुक्तांनी आपल्या तक्रारीत केली आहे. परंतू प्रत्यक्षात त्या तक्रारीवर कारवाई झालेली नाही.प्रशासनावर कुणाचा दबाव?या प्रकरणात चक्क शासन आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अफरातफर करण्यात आल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकाºयांनी तडकाफडकी पोलीस कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार उपायुक्तांनी तक्रारही दाखल केली. मात्र तक्रार देऊन १० दिवस उलटले तरी अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात सदर कंपनीला वाचवण्यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी कारवाई का होत नाही, याचेही स्पष्ट उत्तर पोलीस किंवा प्रशासनाकडून दिले जात नाही.शेतकऱ्यांना गाई मिळणार का?सदर प्रकरणात पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) कार्यालयाने पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करून त्याचा अहवाल दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.महेश बन्सोडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आरमोरीजवळच्या शिवणीत जाऊन सदर कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यात झालेला घोळ स्पष्टपणे समोर आला. आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या गाई आल्या त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही. पशुसंवर्धन विभागाने देसाईगंज येथील वळूमाता संगोपन केंद्रावर ठेवलेल्या १०० फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना दिल्या जाणार का, याबद्दलही आता शंका व्यक्त होत आहे.या प्रकरणात जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार दि.२६ डिसेंबरला आरमोरी पोलीस ठाण्यात प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीविरूद्ध तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणाशी निगडित काही कागदपत्रांची मागणी पोलिसांनी केली होती. आमच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे त्यांना पुरविण्यात आली. मात्र कारवाई झालेली नाही. कंपनीने गायब केलेल्या गाईसुद्धा परत दिलेल्या नाही. पोलिसांनी कारवाई का केलेली नाही याबद्दल माहिती नाही. ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ‘रिसिव्ड कॉपी’सुद्धा मिळालेली नाही.- डॉ.वाय.एस. वंजारी,उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, गडचिरोली

टॅग्स :Farmerशेतकरी