शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार विद्यार्थिनींचा मोफत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:09 IST

राज्य शासनामार्फत अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजना व मानव विकास मिशनच्या बसेस चालविल्या जातात. या दोन्ही योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची सवलत दिली जाते.

ठळक मुद्देपास सवलत : अहिल्याबाई होळकर व मानव विकास योजना, तालुकास्तरावरील शाळांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनामार्फत अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजना व मानव विकास मिशनच्या बसेस चालविल्या जातात. या दोन्ही योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची सवलत दिली जाते. चालू शैक्षणिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ८ हजार ६२४ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. गावाजवळ शाळा राहत नसल्याने बसने प्रवास करावा लागतो. बहुतांश पालकांकडे बसची तिकीट देण्याचीही क्षमता राहत नाही. अशावेळी विद्यार्थिनींची शाळा बंद केली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजना व मानव विकास मिशनची बस योजना सुरू केली आहे. त्यापैकी अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजनाही संपूर्ण राज्यात सुरू आहे. या योजनेंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास उपलब्ध करून दिली जाते. गडचिरोली आगारातून २ हजार ९४२ तर अहेरी आगारातून १ हजार ३५९ विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत शिक्षण घेत आहेत. मोफत बससेवा उपलब्ध असल्याने १० ते १५ किलोमीटरवरून विद्यार्थिनी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.राज्यातील ज्या तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी आहे, अशा तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी शासनाने स्वतंत्र बस उपलब्ध करून दिल्या जातात. सदर बसेस शाळांच्या व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित मार्गावर चालवून विद्यार्थिनींची ने-आण करतात. याही योजनेमध्ये विद्यार्थिनींना मोफत पास उपलब्ध करून दिली जाते. मानव विकास मिशन अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना लाभ दिला जातो. गडचिरोली आगाराला मानव विकास मिशनने ४९ बसेस तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा प्रवास सुकर करण्यात या बसेसची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.या दोन्ही योजनेमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर बहुतांश मुली तालुका व जिल्हास्थळी शिक्षण घेण्यासाठी येत असल्याने विद्यार्थिनींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.आता पाचवी ते बारावीपर्यंत सवलतमागील वर्षीपर्यंत अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत बसपास योजनेचा लाभ दिला जात होता. आॅक्टोबर महिन्यापासून आता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात आहे. विशेष म्हणजे, अकरावी, बारावीचे शिक्षण तालुका, जिल्हा किंवा मोठ्या गावांमध्येच उपलब्ध आहे. कधीकधी सदर ठिकाण गावापासून १५ ते २० किमी राहत असल्याने अनेक विद्यार्थिनी दहावीनंतर शाळा सोडत होत्या. मात्र बारावीपर्यंत मोफत बस सवलत योजना लागू केल्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी