शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
4
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
5
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
6
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
7
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
8
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
9
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
11
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
12
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
13
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
14
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
15
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
16
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
17
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
18
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
19
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी

निधीअभावी चार पाणी पुरवठा योजना रखडल्या

By admin | Updated: May 12, 2016 01:27 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कुरूड, येनापूर, कुनघाडा व अहेरी-नागेपल्ली या चार नळ पाणी पुरवठा योजनांना ...

५० गावांवर जलसंकट : मुख्यमंत्री पाणी योजनेतून निधीचा पत्ता नाहीगडचिरोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कुरूड, येनापूर, कुनघाडा व अहेरी-नागेपल्ली या चार नळ पाणी पुरवठा योजनांना गडचिरोली जिल्हा परिषदेने मंजुरी प्रदान केली आहे. शासनाकडूनही या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र या योजनांना मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेतून निधी न मिळाल्याने सदर चारही योजना रखडल्या आहेत. परिणामी ५० वर गावात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथील नळ योजना १८ गावे तर येनापूर येथील नळ योजना १६ गावांसाठी नियोजित करण्यात आली. याशिवाय कुनघाडा व अहेरी-नागेपल्ली नळ योजनेत अनेक गावांचा समावेश आहे. सदर चारही योजना तत्कालीन जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कार्यकाळात आखण्यात आल्या. मात्र त्यांनी स्वाक्षरी न केल्याने सदर पाणी योजना जिल्हा परिषदेत रखडल्या होत्या. दरम्यान जिल्हा परिषदेचे बांधकाम, वित्त व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार यांनी विद्यमान जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याकडे या चारही योजनांसंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. याची दखल घेत जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी या चारही योजनांवर स्वाक्षऱ्या करून राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला.राज्य शासनाने या चार योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. मात्र निधीअभावी या चार योजनांचे काम अद्यापही सुरू होऊ शकले नाही. गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विद्यमान भाजप सरकारने नवी मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना अंमलात आणली. मात्र या योजनेंतर्गत निधीची मागणी करूनही राज्य सरकारने चामोर्शी व अहेरी या तालुक्यातील चार पाणी योजनांना निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली आहे. अनेकदा या योजनांकरिता निधीची मागणी करण्यात आली. परंतु शासनाचे दुर्लक्ष आहे. (स्थानिक प्रतिनिधी)आघाडी सरकारच्या काळात असलेल्या पाणी पुरवठा योजनेला बंद करून नव्या सरकारने मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना सुरू केली. मात्र अजुनही या योजनेतून नव्या पाणी पुरवठा योजनेसाठी निधीची तरतूद झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील चार पाणी पुरवठा योजना निधी अभावी रखडून पडलेल्या आहे. जिल्हास्तरावर झालेल्या अनेक बैठकीत याबाबत निधीची मागणी करण्यात आली. परंतु दुर्लक्ष केले जात आहे. तत्काळ निधी उपलब्ध करून या चारही योजना मार्गी लावाव्या.- अतुल गण्यारपवार, बांधकाम व नियोजन सभापती जि.प. गडचिरोली