शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू संकलनातून चार गावांना मिळाले ४० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

कुरखेडा तालुक्यात ग्रुप ऑफ ग्रामसभा तयार करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत मोहफूल, तेंदू यासह अन्य वनोपज गोळा करण्याचे काम नागरिकांकडून केले जाते. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालते. यावर्षी लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला.

ठळक मुद्देसंडे अँकर । लॉकडाऊनच्या काळात ग्रामसभेच्या पुढाकाराने नऊ दिवसासाठी मिळाला होता रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : वनहक्क कायद्यानुसार गठीत करण्यात आलेल्या गु्रप ऑफ ग्रामसभामध्ये १० महसुली गावे समाविष्ट आहेत. यापैकी चार गावांनी लॉकडाऊनच्या काळात नऊ दिवसांत तेंदूपत्ता संकलन करून ४०.४२ लाख रुपये मिळविले. यातून चार गावातील ५६८ कुटुंबांना रोजगार मिळाला होता. सरासरी ७ ते १४ हजार रुपये प्रती कुटुंबाला मिळाले.कुरखेडा तालुक्यात ग्रुप ऑफ ग्रामसभा तयार करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत मोहफूल, तेंदू यासह अन्य वनोपज गोळा करण्याचे काम नागरिकांकडून केले जाते. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालते. यावर्षी लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला. परंतु तालुक्यातील ग्रामसभेच्या पुढाकाराने तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यात आले. ग्रुप ऑफ ग्रामसभा कुरखेडामध्ये एकूण १० महसुली गावे समाविष्ट आहेत. यापैकी चार गावातील ५६८ कुटुंबांनी तेंदूपत्ता संकलन करीत नऊ दिवसांत ४० लाख ४२ हजार रुपये मिळविले. विशेष म्हणजे, तेंदू संकलनाची परवानगी मिळावी यासाठी सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती. राज्याच्या मुख्य सचिवांनी १५ एप्रिल रोजी राज्यातील वन व वनेत्तर क्षेत्रातून तेंदूपाने व इतर वनोपज गोळा करून विक्री करण्याची परवानगी दिली. याचा लाभ गरीब गरजू, भूमीहीन नागरिकांना झाला. वनहक्क प्राप्त गावातील ग्रामसभा व गु्रप ग्रामसभांना तेंदूपाने गोळा करून विक्री करणे शक्य झाले. चार गावातील नागरिकांनी एकूण ९ लाख ५१ हजार ७० तेंदूपुडे संकलित करून ४ हजार ४०० रुपये प्रती गोणी प्रमाणे विक्री केली. यात १ हजार १८६ पुरूष व १ हजार २६४ महिलांचा सहभाग होता. या गावांमध्ये ७५ टक्के आदिवासी कुटुंब असून त्यांना संचारबंदीतही रोजगार मिळाला.कृषी निविष्ठा खरेदीसाठी उपयोगदरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम जिल्ह्यातील गावांमध्ये केले जाते. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. यातून प्राप्त झालेल्या पैशाचा वापर शेतकरी खरीप हंगामात बियाणे, खते, नांगरणी, मजुरीकरिता करतात. स्थानिक लोकांना वनहक्कामुळे मालकी हक्क प्राप्त असल्याने वनोपज गोळा करण्याचे अधिकार मिळाले आहे. याचा सदुपयोग अनेक गावातील नागरिक करीत असल्याचे दिसून येते.खुटकटाई बंदीमुळे तेंदूचे संवर्धनग्रामसभांना वनहक्क कायद्यानुसार विशेष अधिकार प्राप्त असल्याने जंगलाचे संरक्षण, संवर्धन अनेक ग्रामसभा करतात. पूर्वी दरवर्षी उन्हाळ्यात तेंदू हंगामापूर्वी तेंदू झाडांची खूटकटाई संबंधित कंत्राटदारांकडून केली जायची. नवीन पालवी यावी, हा यामागील उद्देश होता. परंतु दरवर्षी खूटकटाईमुळे अनेक झाडांची अवैध तोड होऊन झाडांची संख्या झपाट्याने घटत होती. पर्यायाने जंगलाचाही ºहास व्हायचा. परंतु ग्रामसभांनी खूटकटाईवर बंदी घातल्याने तेंदूच्या झाडांचे संवर्धन होत आहे. यासाठी तेंदूपत्ता विक्री निविदा काढताना याबाबतची अट घातली जाते. त्यामुळे तेंदूचे संवर्धन होऊन वनातील झाडांची घनता वाढण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक