शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

जांभुळखेडातील चार सौर पथदिवे बंद

By admin | Updated: July 17, 2014 00:06 IST

राज्यातील विजेची वाढती मागणी, निर्मिती व पुरवठ्याची तूट लक्षात घेऊन राज्य शासनाने अपारंपारिक उर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील रस्त्यावर सौर पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला.

कुरखेडा : राज्यातील विजेची वाढती मागणी, निर्मिती व पुरवठ्याची तूट लक्षात घेऊन राज्य शासनाने अपारंपारिक उर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील रस्त्यावर सौर पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतीला मिळालेल्या अनुदानातून कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे सात सौर पथदिवे लागवण्यात आले. मात्र यापैकी चार पथदिवे तसेच तालुक्यातील काही गावातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बंद असलेले सौर पथदिवे तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी पं.स. सदस्य चांगदेव फाये यांनी केली आहे.जिल्ह्यासह कुरखेडा तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून ग्रामपंचयातीमार्फत सौर पथदिवे अनेक गावात लावण्यात आले. सन २०१२-१३, २०१३-१४ या वर्षात पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, दलित वस्ती सुधार योजना व अन्य योजनेंतर्गत कुरखेडा तालुक्यात २५ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण १७१ सौरपथदिवे लावण्यात आले. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जांभुळखेडासह कुरखेडा तालुक्यातील अनेक गावातील सौरपथदिवे बंद अवस्थेत आहे. सौर पथदिवे बंद असल्याची समस्या जांभुळखेडाच्या नागरिकांनी पं.स. सदस्य चांगदेव फाये यांच्याकडे मांडली. त्यांच्या समस्येची दखल घेऊन चांगदेव फाये यांनी गावकऱ्यासह गावातील सौर पथदिव्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जांभुळखेडाच्या सरपंच सायत्रा गावडे, माजी पं.स. सदस्य जयराम नैताम, अशोक बन्सोड, मुख्याध्यापक फुलबांधे, मनोहर नैताम, कृष्णा मेश्राम, पंढरी मेश्राम, दिलीप धोंडणे आदी उपस्थित होते. कुरखेडा तालुक्यातील बंद असलेले सौर पथदिवे प्रशासनाने तत्काळ सुरू करावेत अशी मागणी चांगदेव फाये यांच्यासह जांभुळखेडा येथील नागरिकांनी केली आहे. सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)