शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

भामरागड मार्गावरील चार ठेंगणे पूल अडवितात वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST

भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर चार ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. पावसाळ्यात सदर रपट्यांवरून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे अनेकदा हा ...

भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर चार ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. पावसाळ्यात सदर रपट्यांवरून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे अनेकदा हा मार्ग रहदारीसाठी बंद असताे. मार्गावरील रपट्यांच्या जागी उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांमध्ये राेष आहे.

दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी भामरागड-आलापल्ली हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर चंद्र नाला, ताडगाव नाला, तसेच कुडकेली व कुमरगुडा गावाजवळ नाला आहे. या नाल्यांवर ठेंगणे पूल व रपटे आहेत. पावसाळ्यात पुलांवरून पुराचे पाणी वाहत असते. दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे; मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने याही वर्षी पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

भामरागड-आलापल्ली मार्गावर जागाेजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. आलापल्लीपर्यंतचे ६५ कि.मी. अंतर गाठण्यासाठी अडीच ते तीन तास प्रवास करावा लागताे. परंतु, सध्या रस्ता बांधकाम सुरू असल्याने ही समस्या सुटणार आहे. तसेच पेरमिली गावाजवळचा मोठा नाला व बांडिया नदीसह पर्लकोटा या मोठ्या नदीवरही उंच पूल बांधण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी चार-पाच दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटताे. परंतु, या पुलांचे बांधकाम झाल्यास संपर्क तुटणार नाही. बारमाही वाहतूक सुरू राहील. चंद्रनाला, कुडकेली नाला, ताडगाव व कुमरगुडा नाल्यांवर उंच पूल बांधकाम करण्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाही. पावसाळ्यात चंद्रनाला पार केला तरी कुडकेली नाला अडवितो. त्यानंतर पेरमिलीपर्यंतही परत जाता येत नाही. तसेच एक वेळ चंद्रनाला व कुडकेली नाला पार केला तर कधी ताडगाव नाला अडवितो किंवा ताडगाव नाला पार केला तर कुमरगुडा नाला वाट अडविताे. पावसाळ्यात थाेडाही पाऊस आल्यास ठेंगणे पूल व रपट्यांवरून पाणी वाहते. पावसाळ्यात ही स्थिती अनेकदा निर्माण हाेते. पायदळ, सायकल व मोटारसायकलस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. खासगी वाहनधारक व रात्री मुक्कामाच्या बसेस पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करतात. त्यामुळे चारही नाल्यांवर उंच पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.