शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती

By गेापाल लाजुरकर | Updated: March 14, 2024 16:39 IST

पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती.

गडचिराेली : पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती. अशीच एक दुर्दैवी घटना देसाईगंज तालुक्याच्या चिखली पेठ येथे मंगळवार १२ मार्च राेजी घडली. चारही मुलीच असलेल्या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांची शवयात्रा मुलींनीच १३ मार्च राेजी आपल्या खांद्यावर वाहून नेली व अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले.

देसाईगंज तालुक्याच्या चिखली पेठ येथील बाबूराव मडावी हे रहिवासी. बाबूराव आणि केमाबाई या दाम्पत्याला उत्तरा, अनुताई, ललिता आणि निराशा आदी चार मुली आहेत. मडावी दाम्पत्याने आपल्या चारही मुलींना शिक्षित करून त्यांचे याेग्य संगाेपन केले. त्यांचे विवाहसुद्धा उरकले. त्यांची मोठी मुलगी उत्तरा काेडापे ही गडचिराेली तालुक्यातील अमिर्झा येथे, दुसरी मुलगी अणूबाई उईके जाेगीसाखरा, तिसरी मुलगी नलू आत्राम फरी येथे तर सर्वात लहान निराशा ही काेरेगाव येथे राहते. मडावी यांच्याकडे जेमतेम दीड एकर काेरडवाहू शेती आहे. याच शेतीच्या भरवशावर ते आपला उदरनिर्वाह करीत हाेते. वृद्धत्वामुळे आजारपणात मुलीच त्यांचा सांभाळ करत होत्या. फरी येथील नलू आत्राम ही अधूनमधून त्यांची देखभाल करण्यासाठी येत असे. वृद्धापकाळामुळे १२ मार्च राेजी दुपारी १:३० वाजता बाबूराव यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी घरीच निधन झाले. बाबूराव यांना मुलगा नव्हता. त्यामुळे मुलींनीच अश्रूंना आवर घालून पार्थिवाला खांदा दिला. १३ मार्च राेजी सकाळी ११:३० वाजता धार्मिक रीतिरिवाजानुसार माती देऊन (मृतदेह गाडून) अंत्यसंस्कार पार पाडले.मुलीच करायच्या शुश्रूषा

बाबूराव मडावी व त्यांची पत्नी वृद्धत्वाकडे कललेल्या हाेत्या. त्यामुळे विविध आजार त्यांना बळावत हाेते. अशातच त्यांची प्रकृती बिघडली की मुली त्यांना आपल्या घरी नेऊन उपचार करायच्या किंवा वडिलांकडे राहुन शुश्रूषा करायच्या. फरी येथील मुलगी त्यांची देखभाल करीत असे.अंत्यसंस्कारासाठी ‘जंकासं’कडून मदत

बाबूराव मडावी हे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सभासद हाेते. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची हाेती. कुटुंबाला अंत्यविधीसाठी मदत व्हावी यासाठी संस्थेकडून आर्थिक मदत उपाध्यक्ष शेषराव कुमरे, संचालक धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे यांच्या हस्ते देण्यात आली.