शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शौचालयाच्या वापरानुसार लागणार चार रंगाचे स्टिकर

By admin | Updated: December 18, 2015 01:42 IST

ग्रामीण भागातील नागरिकांकडे शौचालय आहे काय, असेल तर ते त्याचा वापर करतात किंवा नाही, या सर्व बाबी प्रशासनाच्या लक्षात याव्या यासाठी ....

जिल्हा परिषदेचा उपक्रम : ५२ गावांना विशेष प्राधान्यगडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांकडे शौचालय आहे काय, असेल तर ते त्याचा वापर करतात किंवा नाही, या सर्व बाबी प्रशासनाच्या लक्षात याव्या यासाठी शौचालयांच्या वापरानुसार वेगवेगळ्या रंगाचे चार स्टिकर प्रत्येक शौचालयावर लावण्यात येणार आहेत. २०१५-१६ मध्ये निवड केलेल्या ५२ गावांमध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारीमुक्त गावे करण्यासाठी शासन ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबाला १२ हजार रूपये देऊन शौचालय बांधून देत आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये शौचालयाच्या वापराविषयी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. परिणामी शौचालयाचा वापर इतर कारणांसाठीच केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजपर्यंत शासनाने केलेले कोट्यवधी रूपये पाण्यात गेले, अशीही टीका होत आहे. ज्या कुटुंबाला शासनाने शौचालय बांधून दिले आहे. ते कुटुंब शौचालयाचा वापर करते किंवा नाही, याचा आढावा चार रंगाच्या स्टिकरच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. ज्या कुटुंबातील सर्वच सदस्य शौचालयाचा वापर करतात व त्यांच्या शौचालयाचे बांधकाम चांगल्या स्थितीत आहे, अशा कुटुंबाच्या शौचालयावर ‘लय भारी’ असा संदेश देणारा हिरव्या रंगाचा स्टिकर लावण्यात येणार आहे. शौचालय असूनही काही सदस्य शौचासाठी बाहेर जातात व काही सदस्य शौचालयाचा वापर करतात. अशा कुटुंबाच्या शौचालयावर पिवळ्या रंगाचा ‘फिप्टी-फिप्टी’ असा संदेश दर्शविणारा स्टिकर लावण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, त्याचबरोबर त्यांच्याकडे शौचालय असूनही त्या कुटुंबातील एकही सदस्य शौचालयाचा वापर करीत नाही. त्यांच्या घराच्या भिंतीवर खतरा/धोका असे लाल रंगाचे स्टिकर चिपकविले जाणार आहे.शौचालय नादुरूस्त असेल, मोडकळीस आलेले असेल व वापरास अयोग्य असल्यास त्या शौचालयावर केशरी रंगाचा ‘जरा जपून’ हा संदेश दर्शविणारा स्टिकर चिपकविला जाणार आहे. जिल्हा परिषदेने अशा प्रकारचे स्टिकर मागिले असून आठ दिवसांत सदर स्टिकर प्राप्त होणार आहेत. स्टिकर प्राप्त झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरील पाणी व स्वच्छता विभागात काम करणाऱ्यांकडून सर्वे करून सदर स्टिकर प्रत्येक कुटुंबाच्या शौचालयावर चिपकविले जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी) सार्वजनिक ठिकाणी लावणार फलकशौचालयाचे बांधकाम करून त्याच्या वापराबाबत नागरिकांना प्रेरणा मिळावी, यासाठी प्रत्येक कुटुंबाची शौचालय वापराबाबतची स्थिती दर्शविणारा फलक सार्वजनिक ठिकाणी लावला जाणार आहे. १५ ते २० दिवसानंतर आणखी संबंधित घरांचा सर्वे करून या सर्वेदरम्यान जी स्थिती समोर येईल, त्यानुसार संबंधित फलकामध्ये बदल केला जाणार आहे. सर्वे करताना लाल व पिवळ्या रंगाचे स्टिकर प्राप्त झालेल्या कुटुंबांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी फलक लावल्यामुळे याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊन शौचालयाचा वापर वाढेल.