शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

एकाच वेळी धावतात चार बसेस

By admin | Updated: June 10, 2015 02:03 IST

स्थानिक आगारातील बहुतांश बसेस एकामागे एक धावत असल्याने त्यांना प्रवासी मिळणे कठीण जात असल्याने आगाराला नुकसान सहन करावा लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.

अहेरी : स्थानिक आगारातील बहुतांश बसेस एकामागे एक धावत असल्याने त्यांना प्रवासी मिळणे कठीण जात असल्याने आगाराला नुकसान सहन करावा लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. अहेरी उपविभागात प्रवासी वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने येथील जनतेला अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेसवरच अवलंबून राहावे लागते. तीन वर्षांपूर्वी अहेरी आगाराची चांगली सेवा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होती. मात्र मागील काही दिवसांपासून येथील नियोजन ढेपाळत असल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी सकाळी ११.४५ वाजता हा प्रकार आलापल्ली बसस्थानकावर दिसून आला. अहेरी आगाराच्या एम. एच. डी. ६८- ८३७ या अहेरी- चंद्रपूर या बसमध्ये केवळ एक प्रवासी बसला होता. एम. एच- ४०- ८८५७ या अहेरी-चंद्रपूर या बसमध्ये दोन प्रवासी एम. एच.- ४०- ५१७३ या अहेरी- नागपूर सुपर बसमध्ये सात प्रवासी तर एम. एच. ८७७० या चंद्रपूर आगाराच्या बसमध्ये केवळ चार प्रवासी बसले होते. या सर्व बसेस आलापल्ली बसस्थानकावर एकामागे एक उपस्थित उभ्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे यातील चार बसेस चंद्रपूरसाठी तर एक बस नागपूरसाठी होती. अहेरीपासून चंद्रपूरपर्यंत एकाच्या मागे एक बसेस धावतील तर त्यांना प्रवासी कसे मिळणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. अहेरी आगारातील नियोजन शून्यतेचा प्रकार यावरून स्पष्ट होते. याच बसस्थानकावर मुलचेराकडे जाणारी बस एक तासापासून आली नव्हती. त्यामुळे प्रवासी या ठिकाणी ताटकळत बसले होते. (तालुका प्रतिनिधी)