शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

राज्यपालांच्या रेट्यामुळे चार बॅरेज योजना वाद्यांत

By admin | Updated: January 23, 2015 02:17 IST

राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आले होते.

गडचिरोली : राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आले होते. यामध्ये चिचडोह बॅरेज, हल्दीपुरानी, कोटगल, पुलखल आणि पिपरीरिठ या पाच उपसा सिंचन योजनांचा समावेश होता. यातील चिचडोह बॅरेज उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या उपसा सिंचन योजना मंजूर करून आणण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते हल्दीपुरानी उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजनही करण्यात आले होते. कोटगल उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजन माजी जलसंपदा राज्यमंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उपसा सिंचन योजनेला निधी मंजूर करण्यातही तत्कालीन आमदारांचा पुढाकार होता. यासोबतच कोसरी, येंगलखेडा या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे. गोगाव उपसा सिंचन योजनेचेही काम बऱ्याच प्रमाणात मार्गी लागले आहे. परंतु राज्यपालांनी आता जिल्ह्यात उपसा सिंचन योजनांचे काम यापुढे थांबवावे, असे निर्देश जलसंपदा खात्याला दिलेले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शेती सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शासनाचा हा निर्णय जिल्ह्यावर अन्याय करणारा असल्याचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे. या संदर्भात काँग्रेस लवकरच जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा दिला आहे.