शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

किल्ल्याच्या बुरूजाला पडल्या भेगा

By admin | Updated: July 22, 2016 01:29 IST

‘भिंत खचली, उलथून खांब गेला’ या काव्य ओळीप्रमाणे वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची अवस्था सध्यास्थितीत झालेली आहे.

पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : सौंदर्यीकरणासाठी लाखोंचा खर्च तरीही भग्नावस्था वैरागड : ‘भिंत खचली, उलथून खांब गेला’ या काव्य ओळीप्रमाणे वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची अवस्था सध्यास्थितीत झालेली आहे. किल्ल्याच्या बुरूजाला भेगा पडल्या असून किल्ल्याच्या भिंतींना झाडाझुडुपांनी वेढा दिल्याने किल्ला भग्नावस्थेत आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी लाखोंचा निधी मंजूर होतो. थोडीफार दुरूस्ती होते. परंतु पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. २००१ मध्ये युती सरकारच्या काळात वैरागडला ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी अपेक्षित निधी मंजूर झाला नाही. मागील तीन - चार वर्षांपासून किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा निधी मंजूर होत असला तरी किल्ल्याच्या सौंदर्यीकरणात कोणतीही भर पडली नाही. दोन वर्षांपासून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तटाची दुरूस्ती केली जाते. व पावसाळा सुरू झाला की, सौंदर्यीकरणाचे काम बंद होते. मागील दोन वर्षांत दुरूस्तीसाठी तीन कंत्राटदारांना काम देण्यात आले. लाखो रूपयांचा निधी मंजूर होऊन सदर काम कासवगतीने करण्यात आले. काम मंद गतीने होण्यामागे निधी अपुरा पडत असल्याचे कारण या कंत्राटदारांकडून सांगितल्या जाते. विदर्भात जेवढ्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामध्ये वैरागड येथील भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, किल्ला आदी महत्त्वाचे ठिकाण आहेत. पूर्वी वैरागड येथे हिऱ्याची खाण होती. तिच्या रक्षणासाठी चंद्रपूरचा गोंड राजा बल्हाळशहाने वैरागडचा किल्ला बाराव्या शतकात बांधला. परंतु शासनाकडून या ऐतिहासिक वास्तूची योग्य निगा राखली जात नसल्याने काही वर्षात सदर वास्तू मातीमोल होण्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या वतीने सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले जाते. परंतु पावसाळा सुरू होताच सदर काम बंद केले जाते. त्यामुळे किल्ल्याच्या भिंतीला झाडाझुडुपांचा वेढा असतो. सध्या येथील बुरूजही भग्नावस्थेत जात असल्याने ते खचून दगड अस्ताव्यस्त पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर) वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या सभोवताल खंदक आहे. या खंदकानंतर किल्ल्याची मोठी भिंत आहे. परंतु या भिंतीला झाडाझुडुपांनी वेढा दिल्याने सर्वत्र जंगलाचे रूप किल्ल्याला प्राप्त झाले आहे. सौंदर्यीकरणासाठी झुडुपांची तोड करण्यात आली होती.