शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

वणव्यामुळे वनसंपत्ती धोक्यात

By admin | Updated: April 4, 2015 00:46 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना अचानक आग लागते. तर काही ठिकाणी नागरिक जंगलाला आग लावतात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

येलचिल जंगलात आग : वन विभागाचे दुर्लक्षएटापल्ली : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना अचानक आग लागते. तर काही ठिकाणी नागरिक जंगलाला आग लावतात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आगीमुळे प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी सापडतो. परिणामी करोडो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक होत असते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आलापल्ली वन विभागातील आलापल्ली-एटापल्ली मार्गालगत येलचिल जंगल परिसरात आग लागली. मात्र सदर आग विझविण्यासाठी वन विभागाचे एकही कर्मचारी घटनास्थळी हजर झाले नसल्याची माहिती आहे.आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, वडसा व गडचिरोली आदी पाच वन विभाग आहेत. या पाचही वन विभागात सागवानसह इतर मौल्यवान झाडे आहेत. वणव्यावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण साहित्यासह वन विभाग दक्ष असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र आलापल्ली वन विभागातील दुर्गम येलचिल जंगल परिसरात लागलेल्या वणव्याकडे वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)जनजागृतीचा अभावआलापल्ली वन विभागात दुर्गम व अतिदुर्गम भागात वणव्याबाबतच्या जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र आहे. तेंदूपत्ता संकलन व मोहफूल वेचण्याच्या कामासाठी गाव परिसरातील काही नागरिक जंगलांना आग लावत असल्याचे दिसून येते. मात्र दुर्गम व अतिदुर्गम भागातील आग लागलीच आटोक्यात आणण्यास वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या निमित्याने दिसून येते.