शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वणव्यामुळे वनसंपत्ती धोक्यात

By admin | Updated: April 4, 2015 00:46 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना अचानक आग लागते. तर काही ठिकाणी नागरिक जंगलाला आग लावतात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

येलचिल जंगलात आग : वन विभागाचे दुर्लक्षएटापल्ली : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना अचानक आग लागते. तर काही ठिकाणी नागरिक जंगलाला आग लावतात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आगीमुळे प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी सापडतो. परिणामी करोडो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक होत असते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आलापल्ली वन विभागातील आलापल्ली-एटापल्ली मार्गालगत येलचिल जंगल परिसरात आग लागली. मात्र सदर आग विझविण्यासाठी वन विभागाचे एकही कर्मचारी घटनास्थळी हजर झाले नसल्याची माहिती आहे.आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, वडसा व गडचिरोली आदी पाच वन विभाग आहेत. या पाचही वन विभागात सागवानसह इतर मौल्यवान झाडे आहेत. वणव्यावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण साहित्यासह वन विभाग दक्ष असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र आलापल्ली वन विभागातील दुर्गम येलचिल जंगल परिसरात लागलेल्या वणव्याकडे वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)जनजागृतीचा अभावआलापल्ली वन विभागात दुर्गम व अतिदुर्गम भागात वणव्याबाबतच्या जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र आहे. तेंदूपत्ता संकलन व मोहफूल वेचण्याच्या कामासाठी गाव परिसरातील काही नागरिक जंगलांना आग लावत असल्याचे दिसून येते. मात्र दुर्गम व अतिदुर्गम भागातील आग लागलीच आटोक्यात आणण्यास वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या निमित्याने दिसून येते.