शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

किष्टापूरच्या जंगलात अवैेध कोंबडबाजाराची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:18 IST

अवैैधरित्या कोंबड्याच्या झुंजी लावून त्यावर लाखो रूपयांचा सट्टा लावण्यास कायद्याने बंदी आहे.

ठळक मुद्देलाखो रूपयांचा सट्टाबाजार : खुलेआम चालतात कोंबड्याच्या झुंजी, शौकिनांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अवैैधरित्या कोंबड्याच्या झुंजी लावून त्यावर लाखो रूपयांचा सट्टा लावण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र अहेरी तालुक्याच्या हद्दीत आलापल्ली परिसरातील किष्टापूर येथे गेल्या काही दिवसांपासून खुलेआम कोंबडबाजार सुरू आहे. विशेष म्हणजे या कोंबडबाजारात कोंबड्याच्या झुंजीवर लाखो रूपयांचा सट्टा लावल्या जात आहे. येथे दूरवरून कोंबड शौकीन दुचाकी वाहनाने दाखल होऊन आपली हौस भागवित आहेत.आदिवासी समाजात कोंबड्याच्या झुंजी लावण्याची पारंपरिक प्रथा मानली जाते. मात्र काळानुरूप या प्रथेमध्ये बराच बदल झाला आहे. कोंबडबाजाराच्या नावावर लाखो रूपयांचा सट्टा येथे खेळल्या जात असून यामध्ये नागरिकांसह अल्पवयीन मुलेही गुंतल्या आहेत. त्यामुळे या अल्पवयीन मुलांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अहेरी तालुक्यात वेलगूर-किष्टापूर येथे मागील एक महिन्यापासून अवैधरित्या कोंबडबाजार सुरू आहे. येथे अहेरी, एटापल्ली, मुलचेरा तालुक्यासह तेलंगणा राज्यातील जुगार शौकीनांची गर्दी होत आहे. हजारोच्या संख्येने कोंबडबाजार शौैकीन येथे दाखल होत असतात. मुलचेरा मार्गावरील वन विभागाच्या जंगलात हा कोंबडबाजार भरविला जात असून रस्त्यावरच दुचाकी वाहनांची रांग लागलेली असते. सदर मार्गावर नेहमी वाहनांची रहदारी असल्याने ये-जा करणाºया लोकांचे लक्ष थेट या बाजाराकडे वळत असते. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या कोंबडबाजारावर धाड टाकून कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. अशा प्रकारे कोंबडबाजार गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी खुलेआम भरविला जात आहे.तीन दिवसात लाखोंचा गल्लापोळा सणानिमित्त वेलगूर-किष्टापूर येथे २० आॅगस्टपासून सतत चार दिवस कोंबडबाजार सुरू असल्याने सदर व्यवसाय चालविणाºयांकडे लाखो रूपयांचा गल्ला जमा झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कोंबड्याच्या एका जोडीची झुंज लावण्यासाठी कोंबडबाजार मालक १०० रूपये उकडत असल्याची चर्चा आहे. तसेच कोंबड्याला काती बांधणारा १०० रूपये घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमीपेक्षा यावर्षी कोंबडबाजारातील हे दर वाढले असल्याचे कोंबडा शौकीनांकडून बोेलले जात आहे.परिसरात दारूचा महापूरमागील एक महिन्यापासून कोंबडबाजार सुरू असल्याने वेलगूर-किष्टापुरात देशी, विदेशी दारू सर्रासपणे विकली जात आहे. एवढेच नाही तर कोंबडबाजाराच्या परिसरात विदेशी दारूच्या रिकाम्या बाटला अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर याचा विपरित परिणाम होत असल्याने सदर कोंबडाबाजार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.