शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

जंगलातील आगीमुळे अहेरी परिसराचे वातावरण प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:37 IST

अहेरी : परिसरातील अनेक ठिकाणच्या जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वणव्यातून निघणाऱ्या धुरामुळे अहेरी परिसरातील वातावरण ...

अहेरी : परिसरातील अनेक ठिकाणच्या जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वणव्यातून निघणाऱ्या धुरामुळे अहेरी परिसरातील वातावरण प्रदूषित झाले असून धुरामुळे दररोज धुकेसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. यातून अनेकांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास जाणवू लागला आहे.

अहेरी परिसरात घनदाट जंगल आहे. काही ठिकाणी कृत्रिमरीत्या आगी लावल्या जातात, तर काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या आग लागते. आलापल्ली येथे वनविभागाचे मुख्यालय असून अनेक वनअधिकारी आणि वनरक्षकांचा फौजफाटा तिथे असतो. तरीही जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

एटापल्ली, भामरागड, सिरोंचा मार्गालगत असलेल्या जंगलात आगीचे रौद्र रूप बघावयास मिळत आहे, मात्र वनविभाग ही आग आटोक्यात ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत उदासीन दिसत आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच हवा शुद्ध नसल्याने अनेकांना श्वसनाचा तथा डोळ्यांना जळजळ होऊन सतत पाणी निघण्याचा त्रास सुरू झाला आहे. जंगलात आग लागू नये यासाठी लाखो रुपये खर्च करून फायरलाइनसह विविध प्रयत्न वनविभागाकडून केले जातात. मात्र सहज विझवता येणाऱ्या काही ठिकाणच्या आगीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. या आगीमुळे सरपटणारे छोटे जीव, साप, विंचू व विविध पक्षी मरत आहेत. काही मौल्यवान सागवानाचे वृक्ष आगीत भस्मसात होत आहेत. शिवाय परिसराच्या तापमानातही वाढ होत आहे.

(बॉक्स)

आगीमुळे दोन दुचाकी भस्मसात

धूलिवंदनाच्या दिवशी जंगलातील आगीमुळे आलापल्ली येथील दोन युवकांच्या भामरागड रस्त्यालगत ठेवलेल्या दोन दुचाकी अक्षरशः आगीच्या स्वाधीन झाल्या आणि पूर्णत: जळाल्या. एकीकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी आलापल्ली येथे भेट देऊन वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना जंगल संवर्धनाबाबत आदेश दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलली नाहीत तर राज्यात प्रसिद्ध असलेले अहेरी उपविभागाचे जंगल नामशेष होण्याची शक्यता आहे.