शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील आगीमुळे अहेरी परिसराचे वातावरण प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:37 IST

अहेरी : परिसरातील अनेक ठिकाणच्या जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वणव्यातून निघणाऱ्या धुरामुळे अहेरी परिसरातील वातावरण ...

अहेरी : परिसरातील अनेक ठिकाणच्या जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वणव्यातून निघणाऱ्या धुरामुळे अहेरी परिसरातील वातावरण प्रदूषित झाले असून धुरामुळे दररोज धुकेसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. यातून अनेकांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास जाणवू लागला आहे.

अहेरी परिसरात घनदाट जंगल आहे. काही ठिकाणी कृत्रिमरीत्या आगी लावल्या जातात, तर काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या आग लागते. आलापल्ली येथे वनविभागाचे मुख्यालय असून अनेक वनअधिकारी आणि वनरक्षकांचा फौजफाटा तिथे असतो. तरीही जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

एटापल्ली, भामरागड, सिरोंचा मार्गालगत असलेल्या जंगलात आगीचे रौद्र रूप बघावयास मिळत आहे, मात्र वनविभाग ही आग आटोक्यात ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत उदासीन दिसत आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच हवा शुद्ध नसल्याने अनेकांना श्वसनाचा तथा डोळ्यांना जळजळ होऊन सतत पाणी निघण्याचा त्रास सुरू झाला आहे. जंगलात आग लागू नये यासाठी लाखो रुपये खर्च करून फायरलाइनसह विविध प्रयत्न वनविभागाकडून केले जातात. मात्र सहज विझवता येणाऱ्या काही ठिकाणच्या आगीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. या आगीमुळे सरपटणारे छोटे जीव, साप, विंचू व विविध पक्षी मरत आहेत. काही मौल्यवान सागवानाचे वृक्ष आगीत भस्मसात होत आहेत. शिवाय परिसराच्या तापमानातही वाढ होत आहे.

(बॉक्स)

आगीमुळे दोन दुचाकी भस्मसात

धूलिवंदनाच्या दिवशी जंगलातील आगीमुळे आलापल्ली येथील दोन युवकांच्या भामरागड रस्त्यालगत ठेवलेल्या दोन दुचाकी अक्षरशः आगीच्या स्वाधीन झाल्या आणि पूर्णत: जळाल्या. एकीकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी आलापल्ली येथे भेट देऊन वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना जंगल संवर्धनाबाबत आदेश दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलली नाहीत तर राज्यात प्रसिद्ध असलेले अहेरी उपविभागाचे जंगल नामशेष होण्याची शक्यता आहे.