शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वनविभागाच्या ‘एनओसी’ने अडविला २३ पुलांच्या उभारणीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 11:09 IST

या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू, पुनर्बांधणी केलेले रस्ते कुचकामी

मनोज ताजने

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ४८७ किलोमीटरच्या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनाने २०१८-१९ मध्ये मंजुरी दिली. यातील बहुतांश कामे पूर्णही झालीत, पण या मार्गांवरच्या २३ पुलांना गेल्या ३ वर्षांपासून वनविभागाने ना-हरकत प्रमाणपत्रच दिले नाही. त्यामुळे तयार झालेल्या रस्त्यांचा बारमाही वापर करणे अशक्य होऊन ते पावसाळ्यात कुचकामी ठरत आहेत.

या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. पावसाळ्यात जंगलातून ओसंडून वाहणाऱ्या अनेक नाल्यांमुळे चार ते पाच महिने वाहतूक अडते. शेकडो गावांना मोठ्या गावांत किंवा शहरात वैद्यकीय उपचार, तसेच इतर कामांसाठी येण्याकरिता मोठा वळसा घेऊन यावे लागते. यात त्यांचा वेळ जाऊन, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. हे वाचविण्यासाठी तातडीने पुलांचे काम सुरू होणे गरजेचे आहे.

१९६० च्या नकाशात रस्ते, तरीही वनविभागाचा दावा

वास्तविक १९६०च्या टोपोशिटमध्ये (नकाशे) ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते दाखविले आहे त्या रस्त्यांवरील पुलांसाठीही वनविभागाकडून अडवणूक होत आहे. वनकायदा १९८० मध्ये अस्तित्वात आला. त्यामुळे त्यापूर्वी जी स्थिती होती त्याला वनविभागाने तातडीने एनओसी दिल्यास कामांची गती वाढेल.

निधीसाठी अडले बेली ब्रिजचे काम

दुर्गम भागातील पुलांच्या बांधकामात अनेक वेळा नक्षलवाद्यांकडून अडथळे आणले जातात. ही अडचण लक्षात घेऊन तातडीने तयार होणारे लोखंडी ढाच्याचे बेली ब्रिज तयार करण्यास अनुमती देण्यात आली. मंजूर ५ पैकी सा. बां. विभाग क्र.२ च्या गडचिरोली विभागांतर्गत १८ कोटींच्या २ पुलांची उभारणी झाली आहे. पण, आलापल्ली विभागातील ३ पुलांची उभारणी निधीअभावी अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.

एकूण ६४ पुलांसाठी वनविभागाची एनओसी हवी होती. वेळोवेळी पाठपुरावा करून आणि जुन्या टोपोशिट दाखवून ४८ पुलांना वनविभागाकडून एनओसी मिळविण्यात आली, पण अजून २३ पुलांचे काम अडले आहे. त्यांना लवकर एनओसी मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी पुलांचे काम सुरक्षित स्थितीपर्यंत पूर्ण करणे शक्य होईल.

- नीता ठाकरे, अधीक्षक अभियंता, सा.बां. विभाग

टॅग्स :Governmentसरकारgadchiroli-acगडचिरोली