शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या ‘एनओसी’ने अडविला २३ पुलांच्या उभारणीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 11:09 IST

या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू, पुनर्बांधणी केलेले रस्ते कुचकामी

मनोज ताजने

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ४८७ किलोमीटरच्या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनाने २०१८-१९ मध्ये मंजुरी दिली. यातील बहुतांश कामे पूर्णही झालीत, पण या मार्गांवरच्या २३ पुलांना गेल्या ३ वर्षांपासून वनविभागाने ना-हरकत प्रमाणपत्रच दिले नाही. त्यामुळे तयार झालेल्या रस्त्यांचा बारमाही वापर करणे अशक्य होऊन ते पावसाळ्यात कुचकामी ठरत आहेत.

या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. पावसाळ्यात जंगलातून ओसंडून वाहणाऱ्या अनेक नाल्यांमुळे चार ते पाच महिने वाहतूक अडते. शेकडो गावांना मोठ्या गावांत किंवा शहरात वैद्यकीय उपचार, तसेच इतर कामांसाठी येण्याकरिता मोठा वळसा घेऊन यावे लागते. यात त्यांचा वेळ जाऊन, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. हे वाचविण्यासाठी तातडीने पुलांचे काम सुरू होणे गरजेचे आहे.

१९६० च्या नकाशात रस्ते, तरीही वनविभागाचा दावा

वास्तविक १९६०च्या टोपोशिटमध्ये (नकाशे) ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते दाखविले आहे त्या रस्त्यांवरील पुलांसाठीही वनविभागाकडून अडवणूक होत आहे. वनकायदा १९८० मध्ये अस्तित्वात आला. त्यामुळे त्यापूर्वी जी स्थिती होती त्याला वनविभागाने तातडीने एनओसी दिल्यास कामांची गती वाढेल.

निधीसाठी अडले बेली ब्रिजचे काम

दुर्गम भागातील पुलांच्या बांधकामात अनेक वेळा नक्षलवाद्यांकडून अडथळे आणले जातात. ही अडचण लक्षात घेऊन तातडीने तयार होणारे लोखंडी ढाच्याचे बेली ब्रिज तयार करण्यास अनुमती देण्यात आली. मंजूर ५ पैकी सा. बां. विभाग क्र.२ च्या गडचिरोली विभागांतर्गत १८ कोटींच्या २ पुलांची उभारणी झाली आहे. पण, आलापल्ली विभागातील ३ पुलांची उभारणी निधीअभावी अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.

एकूण ६४ पुलांसाठी वनविभागाची एनओसी हवी होती. वेळोवेळी पाठपुरावा करून आणि जुन्या टोपोशिट दाखवून ४८ पुलांना वनविभागाकडून एनओसी मिळविण्यात आली, पण अजून २३ पुलांचे काम अडले आहे. त्यांना लवकर एनओसी मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी पुलांचे काम सुरक्षित स्थितीपर्यंत पूर्ण करणे शक्य होईल.

- नीता ठाकरे, अधीक्षक अभियंता, सा.बां. विभाग

टॅग्स :Governmentसरकारgadchiroli-acगडचिरोली