शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वनविभागाच्या ‘एनओसी’ने अडविला २३ पुलांच्या उभारणीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 11:09 IST

या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू, पुनर्बांधणी केलेले रस्ते कुचकामी

मनोज ताजने

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ४८७ किलोमीटरच्या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनाने २०१८-१९ मध्ये मंजुरी दिली. यातील बहुतांश कामे पूर्णही झालीत, पण या मार्गांवरच्या २३ पुलांना गेल्या ३ वर्षांपासून वनविभागाने ना-हरकत प्रमाणपत्रच दिले नाही. त्यामुळे तयार झालेल्या रस्त्यांचा बारमाही वापर करणे अशक्य होऊन ते पावसाळ्यात कुचकामी ठरत आहेत.

या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. पावसाळ्यात जंगलातून ओसंडून वाहणाऱ्या अनेक नाल्यांमुळे चार ते पाच महिने वाहतूक अडते. शेकडो गावांना मोठ्या गावांत किंवा शहरात वैद्यकीय उपचार, तसेच इतर कामांसाठी येण्याकरिता मोठा वळसा घेऊन यावे लागते. यात त्यांचा वेळ जाऊन, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. हे वाचविण्यासाठी तातडीने पुलांचे काम सुरू होणे गरजेचे आहे.

१९६० च्या नकाशात रस्ते, तरीही वनविभागाचा दावा

वास्तविक १९६०च्या टोपोशिटमध्ये (नकाशे) ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते दाखविले आहे त्या रस्त्यांवरील पुलांसाठीही वनविभागाकडून अडवणूक होत आहे. वनकायदा १९८० मध्ये अस्तित्वात आला. त्यामुळे त्यापूर्वी जी स्थिती होती त्याला वनविभागाने तातडीने एनओसी दिल्यास कामांची गती वाढेल.

निधीसाठी अडले बेली ब्रिजचे काम

दुर्गम भागातील पुलांच्या बांधकामात अनेक वेळा नक्षलवाद्यांकडून अडथळे आणले जातात. ही अडचण लक्षात घेऊन तातडीने तयार होणारे लोखंडी ढाच्याचे बेली ब्रिज तयार करण्यास अनुमती देण्यात आली. मंजूर ५ पैकी सा. बां. विभाग क्र.२ च्या गडचिरोली विभागांतर्गत १८ कोटींच्या २ पुलांची उभारणी झाली आहे. पण, आलापल्ली विभागातील ३ पुलांची उभारणी निधीअभावी अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.

एकूण ६४ पुलांसाठी वनविभागाची एनओसी हवी होती. वेळोवेळी पाठपुरावा करून आणि जुन्या टोपोशिट दाखवून ४८ पुलांना वनविभागाकडून एनओसी मिळविण्यात आली, पण अजून २३ पुलांचे काम अडले आहे. त्यांना लवकर एनओसी मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी पुलांचे काम सुरक्षित स्थितीपर्यंत पूर्ण करणे शक्य होईल.

- नीता ठाकरे, अधीक्षक अभियंता, सा.बां. विभाग

टॅग्स :Governmentसरकारgadchiroli-acगडचिरोली