शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विशाखा समित्यांबाबत वनविभाग झाला सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे.

ठळक मुद्देपाचही वनविभागांमध्ये समित्या होणार अपडेट; वनसंरक्षकांनी घेतला आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : अमरावती जिल्ह्यातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यामुळे गडचिराेली येथील वनविभागही सतर्क झाला असून, गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक  किशाेर मानकर यांनी विशाखा समित्यांबाबत आढावा घेतला. समित्यांचे पुनर्गठन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेने विशाखा समित्यांचे पुनर्गठन करावे, अशी मागणी वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. याबाबत गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशाेर मानकर यांना विचारले असता, पाचही वनविभागांमध्ये विशाखा समित्या कार्यरत आहेत. या समित्यांचे काही सदस्य बदलून गेले आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती दिली.

महिला कर्मचाऱ्यांच्या मर्यादा समजून घ्या महिला व पुरुष यांच्या शारीरिक जडणघडणीत फरक आहे. महिला ही अधिकारी असली तरी तिच्या शरीराच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशाखा समिती स्थापन करून दरवर्षी या समितीचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश कार्यालये या समित्यांचे पुनर्गठन करीत नाही. त्यामुळे एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास तक्रार करायची कुठे, असा प्रश्न महिला कर्मचाऱ्यांसमाेर उपस्थित हाेत आहे.  प्रशासनात काम करतेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुरुषांच्या तुलनेत महिला थाेड्या अधिक भावनिक राहतात. मात्र मनात कठाेरता निर्माण करण्याची गरज आहे. शासनाच्या पती-पत्नी एकत्रीकरण कायद्यानुसार पती-पत्नींची सेवा जवळ असणे आवश्यक आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याची प्रतिक्रिया महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग