शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

विशाखा समित्यांबाबत वनविभाग झाला सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे.

ठळक मुद्देपाचही वनविभागांमध्ये समित्या होणार अपडेट; वनसंरक्षकांनी घेतला आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : अमरावती जिल्ह्यातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यामुळे गडचिराेली येथील वनविभागही सतर्क झाला असून, गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक  किशाेर मानकर यांनी विशाखा समित्यांबाबत आढावा घेतला. समित्यांचे पुनर्गठन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेने विशाखा समित्यांचे पुनर्गठन करावे, अशी मागणी वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. याबाबत गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशाेर मानकर यांना विचारले असता, पाचही वनविभागांमध्ये विशाखा समित्या कार्यरत आहेत. या समित्यांचे काही सदस्य बदलून गेले आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती दिली.

महिला कर्मचाऱ्यांच्या मर्यादा समजून घ्या महिला व पुरुष यांच्या शारीरिक जडणघडणीत फरक आहे. महिला ही अधिकारी असली तरी तिच्या शरीराच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशाखा समिती स्थापन करून दरवर्षी या समितीचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश कार्यालये या समित्यांचे पुनर्गठन करीत नाही. त्यामुळे एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास तक्रार करायची कुठे, असा प्रश्न महिला कर्मचाऱ्यांसमाेर उपस्थित हाेत आहे.  प्रशासनात काम करतेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुरुषांच्या तुलनेत महिला थाेड्या अधिक भावनिक राहतात. मात्र मनात कठाेरता निर्माण करण्याची गरज आहे. शासनाच्या पती-पत्नी एकत्रीकरण कायद्यानुसार पती-पत्नींची सेवा जवळ असणे आवश्यक आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याची प्रतिक्रिया महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग