शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

विशाखा समित्यांबाबत वनविभाग झाला सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे.

ठळक मुद्देपाचही वनविभागांमध्ये समित्या होणार अपडेट; वनसंरक्षकांनी घेतला आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : अमरावती जिल्ह्यातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यामुळे गडचिराेली येथील वनविभागही सतर्क झाला असून, गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक  किशाेर मानकर यांनी विशाखा समित्यांबाबत आढावा घेतला. समित्यांचे पुनर्गठन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेने विशाखा समित्यांचे पुनर्गठन करावे, अशी मागणी वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. याबाबत गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशाेर मानकर यांना विचारले असता, पाचही वनविभागांमध्ये विशाखा समित्या कार्यरत आहेत. या समित्यांचे काही सदस्य बदलून गेले आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती दिली.

महिला कर्मचाऱ्यांच्या मर्यादा समजून घ्या महिला व पुरुष यांच्या शारीरिक जडणघडणीत फरक आहे. महिला ही अधिकारी असली तरी तिच्या शरीराच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशाखा समिती स्थापन करून दरवर्षी या समितीचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश कार्यालये या समित्यांचे पुनर्गठन करीत नाही. त्यामुळे एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास तक्रार करायची कुठे, असा प्रश्न महिला कर्मचाऱ्यांसमाेर उपस्थित हाेत आहे.  प्रशासनात काम करतेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुरुषांच्या तुलनेत महिला थाेड्या अधिक भावनिक राहतात. मात्र मनात कठाेरता निर्माण करण्याची गरज आहे. शासनाच्या पती-पत्नी एकत्रीकरण कायद्यानुसार पती-पत्नींची सेवा जवळ असणे आवश्यक आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याची प्रतिक्रिया महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग