शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा

By admin | Updated: January 21, 2016 02:40 IST

धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून

धाटाव : धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून अधिकच दूर जात असल्याचे जाणवू लागले आहे. दळणवळणासाठी गाव तिथे रस्त्याचा विकास होत असल्याने कित्येक गावे रस्त्यांमुळे एकमेकांना जोडली आहेत. यामुळे दिवसेंदिवस रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत अधिकच वाढ होत असल्याचे दिसते. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हीच काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते संजय वाढवळ यांनी व्यक्त केले.अपघातात निरपराधांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र काहींना गंभीर दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व घेऊन जगावे लागत आहे. तर अनेकांची कुटुंबे बेघर झाल्याचे ऐकावयास मिळत आहेत, असे वाढवळ म्हणाले. वरदायिनी हायस्कूल महागाव येथे इ. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थी वर्गाला नुकत्याच आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मात अपघातातून सावधानता कशा प्रकारे बाळगावी या संदर्भात संबोधिताना ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक सागडे, खिलारे यांसह सर्व कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढवळ म्हणाले की, ८० टक्के अपघात हे माणसअच्या चुकांमुळे होतात. मोबाइल कानाला लावून वाहन चालवणे, मोबाइलच्या हेडफोनवरु न गाणी ऐकणे तर काही अपघात तंबाखू सेवन व मद्यपान करीत ओव्हरटेक करताना होत आहेत. मात्र या व्यतिरिक्त सध्या तरुणाईला सेल्फीचे वेड लागल्यामुळे डोंगरदऱ्या- खोऱ्यातून जीवाची तमा न बाळगता फोटो काढताना अनेक जणांना जीव गमवावा लागत आहे. (वार्ताहर)