शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

देसाईगंज तालुक्यातील फरी परिसरात फुलल्या भाजीपाल्याच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:21 IST

पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यातही लागवड : दरवर्षी भाजीपाला क्षेत्रात होत आहे वाढ; नगदी पिकांकडे शेतकºयांचा ओढा, इतरांसाठी प्रेरणादायी

अरविंद घुटके।लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. गावाच्या सभोवताल आता धानाच्या शेतीऐवजी भाजीपाल्याचा बागा दिसायला सुरुवात झाली आहे. फरी येथील शेतकºयांनी निवडलेली ही नवीन वाट इतर शेतकºयांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस धानाची शेती आतबट्ट्याचा उद्योग ठरत चालला आहे. मात्र जोखीम उठविण्याची तयारी शेतकºयांमध्ये नसल्याने अनेक शेतकरी अजूनही धानपिकाचीच शेती करीत आहेत. मात्र फरी-झरी गावातील नागरिकांनी धानाच्या शेतीला रामराम ठोकत भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे फरी-झरी परिसरात यापूर्वी हिवाळा व उन्हाळ्यातच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात होते. मात्र आता पावसाळ्यातही भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. फरी-झरी गावाबरोबरच अरततोंडी, मोहटोला, किन्हाळा गावातीलही शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. फरी-झरी गावात १५ ते २० शेतकºयांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. दिनेश मोहुर्ले या शेतकºयाने दोन एकरात भाजीपाल्याची बाग फुलविली आहे. वांगी, कारले, लवकी, दोडका, मिरची, काकडी, टमाटर, चवळीच्या शेंगा आदी पिकांची लागवड केली आहे. दोन एकरातून किमान दोन लाख रूपयांचे उत्पादन होईल, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोेलताना दिली आहे. बंगाली समाजाचे शेतकरी यापूर्वी भाजीपाल्याची लागवड करीत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतरही शेतकºयांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची बोंब होत असतानाच या गावातील शेतकºयांनी मात्र शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली आहे. इतर शेतकºयांसाठी सदर शेतकरी प्रेरणादायी ठरत आहेत.यंदा स्थानिक भाजीपालादेसाईगंजच्या आठवडी बाजारात यापूर्वी पावसाळ्यादरम्यान प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यातील भाजीपाला येत होता. आता मात्र देसाईगंजच्या बाजारपेठेत तालुक्यातीलच भाजीपाला बघायला मिळतो. व्यापाºयांच्या तुलनेत शेतकºयाकडील भाजीपाला स्वस्तदरात मिळत असल्याने शेतकºयांकडील भाजीपाला घेण्यास अधिक पसंती दर्शवित आहेत.नगदी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे, यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून भाजीपाल्याची लागवड करीत असताना कृषी विभागाचे त्यांना मार्गदर्शन लाभत नसल्याचे दिसून येत आहे.