शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

गडचिरोलीत पूर ओसरला, आता रोगराई रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 07:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे.

ठळक मुद्देशुद्ध पाणी पुरवठा नाही ठिकठिकाणी पाण्याचे डबके आणि गाळाचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तीन ते चार दिवस गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करणारी पूरपरिस्थिती बुधवारी पूर्वपदावर आली. गोसेखुर्दमधील विसर्ग बराच कमी केल्यामुळे वैनगंगा नदीसह अनेक उपनद्यांना आलेला पूर ओसरला आहे. मात्र जलमय झालेल्या परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचण्यासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आणि संभावित रोगराईला रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे. अनेक भागात शेकडो हेक्टरवरील धान, कापूस आणि इतर पीक तीन दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने ते मरणासन्न झाले असून वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पुराच्या पाण्याचा गाळ अनेक गावांमध्ये साचला आहे. या पूरपरिस्थितीनंतर पाऊस बरसला असता तर तो गाळ वाहून गेला असता, पण पाऊस नसल्यामुळे गाळ सर्वत्र पसरलेला आहे. पाण्याचे डबकेही साचले आहेत. त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.याशिवाय ठिकठिकाणचे पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याने दुषित झाले आहेत. त्यांचे निर्जंंतुकीकरण करून गावागावांत फवारणी न केल्यास साथरोगाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूर परिस्थितीला जबाबदार कोण?भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून तीन दिवस तब्बल २० ते ३० हजार क्युमेक्सपर्यंत विसर्ग झाल्याने वैनगंगा नदीला आणि तिच्या सर्व उपनद्यांना महापूर आला. यामुळे भंडारा, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात जीवित आणि वित्तहाणी झाली. शेतकऱ्यांसह अनेकांना मोठा फटका बसला. या सर्व नुकसानीसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून सोडलेल्या पाण्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले.

त्यांचे नियोजन आणि तयारी व्यवस्थित नसल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील धरण आणि नद्यांना बसला असल्याचे ते गडचिरोलीत बोलताना म्हणाले. ज्यांचे यात नुकसान झाले त्यापैकी काही लोकांनी आता न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली असून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर