शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पूर ओसरला, आता रोगराई रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 07:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे.

ठळक मुद्देशुद्ध पाणी पुरवठा नाही ठिकठिकाणी पाण्याचे डबके आणि गाळाचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तीन ते चार दिवस गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करणारी पूरपरिस्थिती बुधवारी पूर्वपदावर आली. गोसेखुर्दमधील विसर्ग बराच कमी केल्यामुळे वैनगंगा नदीसह अनेक उपनद्यांना आलेला पूर ओसरला आहे. मात्र जलमय झालेल्या परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचण्यासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आणि संभावित रोगराईला रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे. अनेक भागात शेकडो हेक्टरवरील धान, कापूस आणि इतर पीक तीन दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने ते मरणासन्न झाले असून वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पुराच्या पाण्याचा गाळ अनेक गावांमध्ये साचला आहे. या पूरपरिस्थितीनंतर पाऊस बरसला असता तर तो गाळ वाहून गेला असता, पण पाऊस नसल्यामुळे गाळ सर्वत्र पसरलेला आहे. पाण्याचे डबकेही साचले आहेत. त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.याशिवाय ठिकठिकाणचे पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याने दुषित झाले आहेत. त्यांचे निर्जंंतुकीकरण करून गावागावांत फवारणी न केल्यास साथरोगाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूर परिस्थितीला जबाबदार कोण?भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून तीन दिवस तब्बल २० ते ३० हजार क्युमेक्सपर्यंत विसर्ग झाल्याने वैनगंगा नदीला आणि तिच्या सर्व उपनद्यांना महापूर आला. यामुळे भंडारा, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात जीवित आणि वित्तहाणी झाली. शेतकऱ्यांसह अनेकांना मोठा फटका बसला. या सर्व नुकसानीसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून सोडलेल्या पाण्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले.

त्यांचे नियोजन आणि तयारी व्यवस्थित नसल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील धरण आणि नद्यांना बसला असल्याचे ते गडचिरोलीत बोलताना म्हणाले. ज्यांचे यात नुकसान झाले त्यापैकी काही लोकांनी आता न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली असून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर