शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

गडचिरोलीत पूर ओसरला, आता रोगराई रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 07:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे.

ठळक मुद्देशुद्ध पाणी पुरवठा नाही ठिकठिकाणी पाण्याचे डबके आणि गाळाचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तीन ते चार दिवस गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करणारी पूरपरिस्थिती बुधवारी पूर्वपदावर आली. गोसेखुर्दमधील विसर्ग बराच कमी केल्यामुळे वैनगंगा नदीसह अनेक उपनद्यांना आलेला पूर ओसरला आहे. मात्र जलमय झालेल्या परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचण्यासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आणि संभावित रोगराईला रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे. अनेक भागात शेकडो हेक्टरवरील धान, कापूस आणि इतर पीक तीन दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने ते मरणासन्न झाले असून वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पुराच्या पाण्याचा गाळ अनेक गावांमध्ये साचला आहे. या पूरपरिस्थितीनंतर पाऊस बरसला असता तर तो गाळ वाहून गेला असता, पण पाऊस नसल्यामुळे गाळ सर्वत्र पसरलेला आहे. पाण्याचे डबकेही साचले आहेत. त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.याशिवाय ठिकठिकाणचे पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याने दुषित झाले आहेत. त्यांचे निर्जंंतुकीकरण करून गावागावांत फवारणी न केल्यास साथरोगाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूर परिस्थितीला जबाबदार कोण?भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून तीन दिवस तब्बल २० ते ३० हजार क्युमेक्सपर्यंत विसर्ग झाल्याने वैनगंगा नदीला आणि तिच्या सर्व उपनद्यांना महापूर आला. यामुळे भंडारा, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात जीवित आणि वित्तहाणी झाली. शेतकऱ्यांसह अनेकांना मोठा फटका बसला. या सर्व नुकसानीसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून सोडलेल्या पाण्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले.

त्यांचे नियोजन आणि तयारी व्यवस्थित नसल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील धरण आणि नद्यांना बसला असल्याचे ते गडचिरोलीत बोलताना म्हणाले. ज्यांचे यात नुकसान झाले त्यापैकी काही लोकांनी आता न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली असून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर