शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जैैविक खतांवर फुलविल्या फळभाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:10 IST

ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत.

ठळक मुद्देरसायनांचा गंधही नाही : बुर्गीतील बचत गटाच्या महिलांची आर्थिक उन्नतीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत. परंतु एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बुर्गी येथील बचत गटाने अनोख्या पद्धतीने फळभाजीपाला लागवड व्यवसाय सुरू केला. रासायनिक खतांचा वापर न करता महिलांनी जैविक खतांचा वापर करून फळभाज्यांची बाग फुलविली. यातून त्यांना दरमहा ८ ते १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळत आहे.तालुक्यातील बहुतांश गावे ही नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहेत. शहरी भागाच्या तुलनेत हा भाग आजही विकासापासून दूर आहे. महिलांना रोजगार मिळत नाही. अशा स्थितीत बुर्गीच्या लक्ष्मी बचत गटाच्या महिलांनी रोजगार निर्मिती व आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी एक पाऊल पुढे टाकले. सुरूवातीला गावातील १० महिलांनी एकत्र येऊन लक्ष्मी बचत गटाची स्थापना केली.बचत गटाची स्थापना तर झाली, मात्र रोजगारासाठी बचत गटाकडे काहीच मार्ग नव्हता. बुर्गीचे उपसरपंच रामा तलांडे यांनी बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देत त्यांना आपल्या मालकीची जमीन कसण्यासाठी दिली. त्यानंतर महिलांनी माविमच्या माध्यमातून बँकेद्वारा बचत गटास ६० हजाराचे कर्ज मिळविले. या पैशातून महिलांनी मल्चिंग पेपर, पाण्यासाठी पंप मशीन घेतली. जमिनीच्या मशागतीसाठी व इतर बाबींसाठी उपसरपंच रामा तलांडे यांनी मदत केली. या सर्व परिश्रमानंतर फळभाजीपाल्याची बाग महिलांनी तयार केली.भाजीपाला वाढीसाठी रासायनिक खतांचा करताना आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम जाणून बागेतील रोपांच्या वाढीसाठी महिलांनी रासायनिक खतांचा वापर टाळत जैविक खतांचा वापर केला. या खतांच्या माध्यमातून फळभाज्यांची जोमाने वाढ झाली. सध्या या बागेतील भाजीपाला व फळभाज्या निघण्यास सुरूवात झाली आहे. या बागेतून निघालेला भाजीपाला व फळभाज्या महिला बुर्गीच्या आठवडी बाजारात दर बुधवारी विक्रीसाठी ठेवतात. सध्या महिलांना महिन्याकाठी ८ ते १० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे.जिल्ह्यात भरपूर महिला बचत गट आहेत. मात्र परिश्रम करून फळभाज्यांची बाग फुलवित आर्थिक भरभराटीकडे वाटचाल करणारा बुर्गीचा लक्ष्मी महिला बचत गट जिल्ह्यातील इतर बचत गटांच्या महिलांसाठी आदर्श ठरत आहे.कामाचे योग्य नियोजन व लेखाजोखाफळभाज्यांच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून महिलांनी काही महिन्यांतच ४२ हजारांचे कर्जसुद्धा फेडले. बागेची योग्य निगा राखली जावी यासाठी बचत गटाच्या दोन महिला आळीपाळीने दररोज बागेत काम करीत असतात. दर रविवारी सदस्यांची बैठक घेतली जाते या बैठकीत हिशेब व लेखाजोखा मांडला जातो. बचत गटातील महिलांच्या आर्थिक उन्नतीत आणखी भर पडावी यासाठी मिनी राईस मिल योजनेच्या माध्यमातून प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे, असा मानस उपसरपंच रामा तलांडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :vegetableभाज्या