शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

२५ एकर शेतातील तूर पीक आगीने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:32 IST

येथून सात किमी अंतरावरील महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला शनिवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर शेतामधील तुरीचे पीक जळून खाक झाले.

ठळक मुद्देमहागाव येथील घटना : उभ्या पिकाला भर दुपारी लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथून सात किमी अंतरावरील महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला शनिवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर शेतामधील तुरीचे पीक जळून खाक झाले.शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीचे महागाव लगत २५ एकर शेत असून या शेतात त्यांनी तुरीचे पीक घेतले होते. यात १२ एकरातील तूर पीक कापून ते एका ठिकाणी जमा करून ठेवले होते. तसेच उर्वरित १३ एकरातील तुरीचे पीक उभे होते. मात्र शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास उभ्या तुरीच्या पिकाला आग लागली. आग लागल्याचे समजताच शंकर गोंगले व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय अलोने यांनी शेताकडे धाव घेतली. संजय अलोने यांनी त्वरित अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांना याची माहिती दिली. लगेच अहेरी नगर पंचायतचे अग्नीशामन वाहन निघाले मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होते. आगीत शेतातील संपूर्ण पीक जळून खाक झाले. शेतकरी शंकर गोंगले यांचे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.पीक आगीत जळत असल्याचे बघून शंकर गोंगले यांनी टाहो फोडला. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले. तलाठी राजेंद्र आव्हाड यांनी पंचनामा केला. ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी मुद्दाम ही आग लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे. सदर शेतकºयाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :fireआग