शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

२५ एकर शेतातील तूर पीक आगीने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:32 IST

येथून सात किमी अंतरावरील महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला शनिवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर शेतामधील तुरीचे पीक जळून खाक झाले.

ठळक मुद्देमहागाव येथील घटना : उभ्या पिकाला भर दुपारी लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथून सात किमी अंतरावरील महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला शनिवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर शेतामधील तुरीचे पीक जळून खाक झाले.शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीचे महागाव लगत २५ एकर शेत असून या शेतात त्यांनी तुरीचे पीक घेतले होते. यात १२ एकरातील तूर पीक कापून ते एका ठिकाणी जमा करून ठेवले होते. तसेच उर्वरित १३ एकरातील तुरीचे पीक उभे होते. मात्र शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास उभ्या तुरीच्या पिकाला आग लागली. आग लागल्याचे समजताच शंकर गोंगले व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय अलोने यांनी शेताकडे धाव घेतली. संजय अलोने यांनी त्वरित अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांना याची माहिती दिली. लगेच अहेरी नगर पंचायतचे अग्नीशामन वाहन निघाले मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होते. आगीत शेतातील संपूर्ण पीक जळून खाक झाले. शेतकरी शंकर गोंगले यांचे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.पीक आगीत जळत असल्याचे बघून शंकर गोंगले यांनी टाहो फोडला. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले. तलाठी राजेंद्र आव्हाड यांनी पंचनामा केला. ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी मुद्दाम ही आग लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे. सदर शेतकºयाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :fireआग