शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांवर घरांची पावसामुळे पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्दे२१ जण वाहून गेले : सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पावसाने हाह:कार उडवल्याने सर्वच तालुक्यांत वारंवार अतिवृष्टी झाली. त्यातही अहेरी उपविभागात येणाऱ्या भामरागडसह इतर तालुक्यांमध्ये पावसामुळे बरीच हाणी झाली आहे. नुकसानाचा अंदाज घेणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून पडझड झालेल्या घरांचा आकडा ५ हजारांच्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे वारंवार नदी व नाल्यांना आलेल्या पुरांमुळे आतापर्यंत २१ जणांना जीव गमवावा लागला. त्यातील ५ जणांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत.पावसाळ्याचे अजून १० दिवस शिल्लक असले तरी आतापर्यंत वार्षिक सरासरीपेक्षा बराच जास्त म्हणजे १८२८ मिमी पाऊस बरसला आहे. सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यात जीवित आणि वित्तहाणीचे प्रमाणही जास्त आहे.भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीला येणाऱ्या पुरामुळे तालुका मुख्यालयासह काही गावांचा संपर्क तुटतो. तसेच अनेक गावांमध्ये जाण्यासाठी छोटे नाले ओलांडून जावे लागते. परंतू सततच्या पावसामुळे हे नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने गावकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. त्या नाल्यातून किंवा त्यावरील ठेंगण्या पुलावरून पैलतीर गाठण्याच्या प्रयत्नात भामरागड तालुक्यात ९ जणांना बळी जावे लागले. त्यातील २ जणांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले.जीवित हाणीत सर्वाधिक ९ जण भामरागड तालुक्यातील, तर ४ जण अहेरी तालुक्यातील आहेत. याशिवाय गडचिरोली व आरमोरी तालुक्यात प्रत्येकी २, तर चामोर्शी, मुलचेरा, कुरखेडा व कोरची तालुक्यात प्रत्येकी एक जण पुरात वाहून गेला. पुराच्या पाण्यात शिरून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात हे सर्वजण वाहून गेले.पूरपरिस्थितीचा फटका मुक्य प्राण्यांनाही बसला. आतापर्यंत ५९४ जवानरांना जीव गमवावा लागला.मदत वाटपाचे काम होणार आता वेगानेपावसाने थोडी उसंत घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणासाठी पाठविलेल्या इतर तालुक्यातील अतिरिक्त मनुष्यबळामुळे भामरागड तालुक्यात नुकसानाचे पंचनामे करण्याचे आव्हानात्मक काम आता पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे लवकरच त्या सर्व नुकसानग्रस्तांना रोख स्वरूपात मदत वाटपाचे काम सुरू होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले.योग्य व्यवस्थापनामुळे जीवितहानी टळलीवारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागडसोबत एटापल्ली, अहेरी, आरमोरी, गडचिरोली व इतरही तालुक्यांमध्ये अनेक जण पुरात अडकून पडले होते. त्या सर्वांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी वेळीच आपल्या पथकांना तिथे पाठवून त्यांचा जीव वाचवला. या अधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करून कमीत कमी नुकसान होण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत पूरग्रस्तांना आश्रय देण्यासाठीही धावपळ केली. त्यामुळे संभावित जीवित हाणी टाळण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले. आता नागरिकांकडून प्राप्त मदत वाटपाचे काम सुरू आहे.

टॅग्स :Rainपाऊस