शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांवर नागरिक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.

ठळक मुद्देपरवानगीची प्रतीक्षा । जिल्हाभरात १५ हजारांवर नागरिक विलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊननंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेले जवळपास ३२०० नागरिक आणि बाहेरच्या राज्यात असलेले २ हजारांवर नागरिक अजूनही जिल्ह्यात येणे बाकी आहेत. प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या या नागरिकांना योग्य पद्धतीने विलगिकरणात ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.राज्यातल्या इतर जिल्ह्यातून गडचिरोलीत येऊ इच्छिणाऱ्या ४ हजार लोकांनी प्रशासनाकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९९ जण आतापर्यंत आले आहेत. गडचिरोली ग्रिन झोन (एकही रुग्ण नाही) असल्यामुळे बाहेरून येणाºया कोणत्याही व्यक्तीपासून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देताना खबरदारी घेतली जात आहे.बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात येण्यासाठी १६ हजार ८६९ लोकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ५०६ लोक आले असून २३६३ लोक येणे बाकी आहे.१७९ जण बाहेरच्या जिल्ह्यात जाणे बाकीगेल्या चार दिवसांपासून अडकलेल्या लोकांची देवाण-घेवाण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत इतर जिल्ह्यातील ४५० लोकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात पाठवण्यात आले. अजून १७९ लोक बाकी आहेत. त्यात चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. त्यांना लवकरच रवाना केले जाणार आहे.१३४ जण बाहेरच्या राज्यात जाणे बाकीलॉकडाऊन लागल्यानंतर बाहेरच्या राज्यातील ८८६ लोक गडचिरोली जिल्ह्यात अडकले होते. त्यापैकी ७५२ लोक आतापर्यंत त्यांच्या राज्यात रवाना झाले. अजून १३४ जण बाकी आहेत. त्यात अहमदाबाद, राजस्थान या राज्यातील आहेत. त्यांच्या प्रवासाची (रेल्वे वगैरे) सोय होताच त्यांनाही रवाना केले जाणार आहे. हे लोक मजूरवर्ग नसून वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त जिल्ह्यात आलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या