लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊननंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेले जवळपास ३२०० नागरिक आणि बाहेरच्या राज्यात असलेले २ हजारांवर नागरिक अजूनही जिल्ह्यात येणे बाकी आहेत. प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या या नागरिकांना योग्य पद्धतीने विलगिकरणात ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.राज्यातल्या इतर जिल्ह्यातून गडचिरोलीत येऊ इच्छिणाऱ्या ४ हजार लोकांनी प्रशासनाकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९९ जण आतापर्यंत आले आहेत. गडचिरोली ग्रिन झोन (एकही रुग्ण नाही) असल्यामुळे बाहेरून येणाºया कोणत्याही व्यक्तीपासून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देताना खबरदारी घेतली जात आहे.बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात येण्यासाठी १६ हजार ८६९ लोकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ५०६ लोक आले असून २३६३ लोक येणे बाकी आहे.१७९ जण बाहेरच्या जिल्ह्यात जाणे बाकीगेल्या चार दिवसांपासून अडकलेल्या लोकांची देवाण-घेवाण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत इतर जिल्ह्यातील ४५० लोकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात पाठवण्यात आले. अजून १७९ लोक बाकी आहेत. त्यात चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. त्यांना लवकरच रवाना केले जाणार आहे.१३४ जण बाहेरच्या राज्यात जाणे बाकीलॉकडाऊन लागल्यानंतर बाहेरच्या राज्यातील ८८६ लोक गडचिरोली जिल्ह्यात अडकले होते. त्यापैकी ७५२ लोक आतापर्यंत त्यांच्या राज्यात रवाना झाले. अजून १३४ जण बाकी आहेत. त्यात अहमदाबाद, राजस्थान या राज्यातील आहेत. त्यांच्या प्रवासाची (रेल्वे वगैरे) सोय होताच त्यांनाही रवाना केले जाणार आहे. हे लोक मजूरवर्ग नसून वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त जिल्ह्यात आलेले आहेत.
पाच हजारांवर नागरिक येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST
बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.
पाच हजारांवर नागरिक येणार
ठळक मुद्देपरवानगीची प्रतीक्षा । जिल्हाभरात १५ हजारांवर नागरिक विलगीकरणात