शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

पाच हजारांवर नागरिक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.

ठळक मुद्देपरवानगीची प्रतीक्षा । जिल्हाभरात १५ हजारांवर नागरिक विलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊननंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेले जवळपास ३२०० नागरिक आणि बाहेरच्या राज्यात असलेले २ हजारांवर नागरिक अजूनही जिल्ह्यात येणे बाकी आहेत. प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या या नागरिकांना योग्य पद्धतीने विलगिकरणात ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.राज्यातल्या इतर जिल्ह्यातून गडचिरोलीत येऊ इच्छिणाऱ्या ४ हजार लोकांनी प्रशासनाकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९९ जण आतापर्यंत आले आहेत. गडचिरोली ग्रिन झोन (एकही रुग्ण नाही) असल्यामुळे बाहेरून येणाºया कोणत्याही व्यक्तीपासून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देताना खबरदारी घेतली जात आहे.बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात येण्यासाठी १६ हजार ८६९ लोकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ५०६ लोक आले असून २३६३ लोक येणे बाकी आहे.१७९ जण बाहेरच्या जिल्ह्यात जाणे बाकीगेल्या चार दिवसांपासून अडकलेल्या लोकांची देवाण-घेवाण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत इतर जिल्ह्यातील ४५० लोकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात पाठवण्यात आले. अजून १७९ लोक बाकी आहेत. त्यात चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. त्यांना लवकरच रवाना केले जाणार आहे.१३४ जण बाहेरच्या राज्यात जाणे बाकीलॉकडाऊन लागल्यानंतर बाहेरच्या राज्यातील ८८६ लोक गडचिरोली जिल्ह्यात अडकले होते. त्यापैकी ७५२ लोक आतापर्यंत त्यांच्या राज्यात रवाना झाले. अजून १३४ जण बाकी आहेत. त्यात अहमदाबाद, राजस्थान या राज्यातील आहेत. त्यांच्या प्रवासाची (रेल्वे वगैरे) सोय होताच त्यांनाही रवाना केले जाणार आहे. हे लोक मजूरवर्ग नसून वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त जिल्ह्यात आलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या