शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

पाच हजारांवर नागरिक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.

ठळक मुद्देपरवानगीची प्रतीक्षा । जिल्हाभरात १५ हजारांवर नागरिक विलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊननंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेले जवळपास ३२०० नागरिक आणि बाहेरच्या राज्यात असलेले २ हजारांवर नागरिक अजूनही जिल्ह्यात येणे बाकी आहेत. प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या या नागरिकांना योग्य पद्धतीने विलगिकरणात ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित्यांनी त्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्या लोकांच्या घरून जेवणाचा डबा येतो किंवा ते लोक त्याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत.राज्यातल्या इतर जिल्ह्यातून गडचिरोलीत येऊ इच्छिणाऱ्या ४ हजार लोकांनी प्रशासनाकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९९ जण आतापर्यंत आले आहेत. गडचिरोली ग्रिन झोन (एकही रुग्ण नाही) असल्यामुळे बाहेरून येणाºया कोणत्याही व्यक्तीपासून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देताना खबरदारी घेतली जात आहे.बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात येण्यासाठी १६ हजार ८६९ लोकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ५०६ लोक आले असून २३६३ लोक येणे बाकी आहे.१७९ जण बाहेरच्या जिल्ह्यात जाणे बाकीगेल्या चार दिवसांपासून अडकलेल्या लोकांची देवाण-घेवाण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत इतर जिल्ह्यातील ४५० लोकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात पाठवण्यात आले. अजून १७९ लोक बाकी आहेत. त्यात चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. त्यांना लवकरच रवाना केले जाणार आहे.१३४ जण बाहेरच्या राज्यात जाणे बाकीलॉकडाऊन लागल्यानंतर बाहेरच्या राज्यातील ८८६ लोक गडचिरोली जिल्ह्यात अडकले होते. त्यापैकी ७५२ लोक आतापर्यंत त्यांच्या राज्यात रवाना झाले. अजून १३४ जण बाकी आहेत. त्यात अहमदाबाद, राजस्थान या राज्यातील आहेत. त्यांच्या प्रवासाची (रेल्वे वगैरे) सोय होताच त्यांनाही रवाना केले जाणार आहे. हे लोक मजूरवर्ग नसून वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त जिल्ह्यात आलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या