शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : विविध विकासकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शुक्रवारी ब्रह्मपुरी विश्रामगृहावर आले असताना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तहसीलअंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. ब्रह्मपुरी येथील नाट्यगृह, बारई तलावाचे सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले. नगर पालीकेच्या २२ कोटी रुपयांच्या नळयोजनेचा आढावा घेतला. तसेच सर्व क्रीडा संकूल पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. सिंदेवाही येथील विश्रामगृह दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय वन जमीन पट्टे तसेच विविध ठिकाणच्या आवास योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचे निर्देश देत उपविभागातील तलाठी कार्यालय, त्यांची सद्यस्थिती व निर्मिती संदर्भातही त्यांनी यावेळी आढावा घेतला. असोलामेंढा पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांनाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी तिन्ही तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.नुकसान भरपाईचा आढावासावली परिसरात पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. असून १२ हजार ८५६ शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले असून ७२७२.९० हेक्टरवर नुकसान झाले होते. आतापर्यंत चार कोटीवर यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. त्यापैकी तीन कोटी ८७ लाख वितरीत करण्यात आले. तर ब्रह्मपुरी तालुक्यात देखील चार हजार ३३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले होते. ३१४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी १ कोटी ९३ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार