शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : विविध विकासकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शुक्रवारी ब्रह्मपुरी विश्रामगृहावर आले असताना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तहसीलअंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. ब्रह्मपुरी येथील नाट्यगृह, बारई तलावाचे सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले. नगर पालीकेच्या २२ कोटी रुपयांच्या नळयोजनेचा आढावा घेतला. तसेच सर्व क्रीडा संकूल पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. सिंदेवाही येथील विश्रामगृह दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय वन जमीन पट्टे तसेच विविध ठिकाणच्या आवास योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचे निर्देश देत उपविभागातील तलाठी कार्यालय, त्यांची सद्यस्थिती व निर्मिती संदर्भातही त्यांनी यावेळी आढावा घेतला. असोलामेंढा पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांनाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी तिन्ही तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.नुकसान भरपाईचा आढावासावली परिसरात पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. असून १२ हजार ८५६ शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले असून ७२७२.९० हेक्टरवर नुकसान झाले होते. आतापर्यंत चार कोटीवर यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. त्यापैकी तीन कोटी ८७ लाख वितरीत करण्यात आले. तर ब्रह्मपुरी तालुक्यात देखील चार हजार ३३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले होते. ३१४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी १ कोटी ९३ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार