शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

दीक्षाभूमीसाठी पाच कोटींचा निधी देणार

By admin | Updated: August 17, 2016 01:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ...

सामाजिक न्यायमंत्र्यांचे आश्वासन : देसाईगंज नगर परिषदेतर्फे गुणवंताचा सत्कार देसाईगंज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊन विकासकामांना सुरूवात केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र समोर ठेवूनच शहराचा विकास होत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांचे विकासकामे करण्यात आली आहेत. या विकासकामांचे लोकार्पण नामदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते १६ आॅगस्ट रोजी करण्यात आले. यानिमित्त नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. अनिल सोले, आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, पंचायत समिती सभापती प्रिती शंभरकर, नगराध्यक्ष शाम उईके, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मुरलीधर सुंदरकर, नाना नाकाडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, भामानी, नगर परिषद मुख्याधिकारी तैमूर मुलानी, आबीदअली सय्यद, विकास साळवे, मनोज खोब्रागडे, शालू दंडवते, आशा राऊत, सुनिता ठेंगरी, करूणा गणवीर, निलोफर शेख, शोभा पत्रे, विजया सरदारे, भाविका तलमले, शरद मुळे, कल्पना माडावार, डॉ. महेश पापडकर आदी मान्यवर उपस्थित होत. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपा सरकार सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून योजना आखत आहे. याच योजना गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या वेळी आखल्या असत्या तर आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच झाला असता, भाजपाचे सरकार येऊन केवळ दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या काळात देसाईगंज नगर परिषदेला राज्य सरकारने कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येणाऱ्या तीन वर्षात देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प राहिल, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. (वार्ताहर)