शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विसामुंडीत पोहोचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २०० किलोमीटर अंतरावर आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विसामुंडी या आदीवासी गावात मंगळवारी (दि.२६) तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदारांचे गाव शिवारातून आदीवासी नागरिकांनी परंपरागत ढोल-सनईच्या सुरात स्वागत केले.

ठळक मुद्देसहा वर्षांपासून रखडले होते काम : गाव उजळल्या नागरिकांना आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : प्रत्येक गाव इंटरनेट, मोबाईलने जोडण्याचे स्वप्न दाखविले जात असले तरी स्वातंत्र्याच्या ७० वर्षात जीवनावश्यक बाब झालेली वीज अद्याप काही गावात पोहोचलेली नाही. त्यापैकीच एक गाव असलेल्या भामरागड तालुक्यातील विसामुंडी या गावात नवीन ट्रान्सफार्मर देऊन गावात पहिल्यांदाच वीज पुरवठा करण्यात आला. यामुळे वर्षानुवर्षे रात्रीला दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात वावरणारे गाव वीजेच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाल्याचे पाहून गावकरी आनंदात न्हाऊन निघाले.जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २०० किलोमीटर अंतरावर आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विसामुंडी या आदीवासी गावात मंगळवारी (दि.२६) तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदारांचे गाव शिवारातून आदीवासी नागरिकांनी परंपरागत ढोल-सनईच्या सुरात स्वागत केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मेश्राम, तलाठी राममुर्ती गड्डमवार, कोतवाल दौलत तलांडे यांच्यासह सर्व गावकरी उपस्थित होते .गावात आतापर्यंत वीज नसल्याने नागरिकांना टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट यापासून वंचित राहावे लागत होते. रात्रीच्या सुमारास शेकोटी पेटवुन दिवस काढावे लागत होते. दुर्गम भाग असल्याने वन्यप्राण्यांचाही धोका असायचा. त्यामुळे रात्रीच्या अंधारात कसाबसा जीव मुठीत धरून राहावे लागत असे. जिल्हा नियोजन व विकास योजनेतुन या गावाचे विद्युतीकरण तसेच सौभाग्य योजनेतून नागरिकांना वीज जोडणी देण्याच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षापुर्वीच काम हाती घेतले होते. परंतु खांब उभारणी, विजेचे तार जोडणीचे काम अर्धवट टाकून सदर ठेकेदार बेपत्ता झाला होता. त्यामुळे काम रखडले होते.याबाबतीत गावातील सूज्ञ नागरिक, परिसरातील काही पुढाऱ्यांनी अनेक वेळा निवेदनेही दिली. मात्र अधिकारी, पदाधिकारी याकडे फारसे लक्ष देत नव्हते. अखेर गावकऱ्यांनी तहसीलदार कैलास अंडील यांची भेट घेऊन गावात वीज पुरवठा देण्याची मागणी केली. त्यांनी सदर काम कुठे थांबले आहे याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केला. जिल्हाधिकाºयांनीही तत्परतेने प्रतिसाद देऊन हे काम मार्गी लावले. अखेर गेल्या पाच-सहा वर्षापासून रखडलेले हे काम पुन्हा सुरू होऊन अखेर वीज जोडणी पूर्ण करण्यात आली.दिवसा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर रात्री वीजेच्या दिव्यांमुळे पडणारा लख्ख प्रकाश पहिल्यांदाच गावकऱ्यांनी अनुभवला. त्यामुळे ते चांगलेच हरखून गेले होते. सध्या प्रत्येक घरी वीज जोडणी नसली तरी लवकरच प्रत्येक घरात वीज पुरवठा दिला जाणार आहे.परिसरातील गावकऱ्यांच्या आशा पल्लविततहसीलदार अंडील यांच्या हस्ते मंगळवारी वीज पुरवठ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरात कत्रणगट्टा, मर्दहूर व गुंडपुरी गावातील लोकही जमले होते. त्या गावांमध्येही अजून वीज पोहोचलेली नाही. त्यांनी आपल्या गावातही वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे केली. लवकरच त्या गावांतही वीज पुरवठ्याचे काम सुरू करण्याची ग्वाही त्यांनी गावकऱ्यांना दिली.विसामुंडी गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत. जंगलातून बैलबंडीने कच्च्या मार्गानेच नागरिकांना डोंगरदऱ्यातून वाट काढत गावात जावे लागते. अशा स्थितीत गावापर्यंत वीज पुरवठा पोहोचवल्याबद्दल नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार अंडिल, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :electricityवीज