शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी मुलमुले व पल्लवी किरमे जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: June 9, 2015 02:06 IST

गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची

जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के : १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण; १ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रावीण्य; २ हजार २३५ विद्यार्थी नापासगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची रोहिणी प्रकाश मुलमुले व राणी दुर्गावती कन्या शाळा गडचिरोलीची पल्लवी मुकूंदा किरमे या दोन विद्यार्थिनी प्रथम आल्या आहेत. दोघीनाही ९६.६० टक्के गुण आहे. जिल्ह्यातून १६ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नामांकन केले होते. १६ हजार २६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक हजार १२९ विद्यार्थी प्राविण्यासह ४ हजार ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार ७१० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ८०५ विद्यार्थी साधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८६.२३ आहे. जिल्ह्यातून ९६.२० टक्के गुण घेऊन सेंट फ्रान्सीस हायस्कूल नागेपल्लीची संजना गुंडावार ही विद्यार्थिनी दुसरी आली आहे. तर ९६ टक्के गुण घेऊन प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोलीचा पियुष अलोणे व डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरीची श्रेया देविकार हे अनुक्रम तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवाजी हायस्कूल गडचिरोलीचा अभिनव अरूण मुनघाटे हा ९५.८० टक्के गुण घेऊन चौथ्या स्थानावर आहे. तर याच शाळेची पूर्वा बुटे ही ९५.६० टक्के गुण घेऊन पाचव्या स्थानावर आहे. गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी शाळेचा देवांग सिडाम हा विद्यार्थी ९५.२० टक्के गुण घेऊन सहाव्या स्थानावर आहे. यंदा जिल्ह्यात २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल भगवंतराव हायस्कूल ठाकरी इल्लूर ता. चामोर्शीचा ४२.८५ टक्के लागला आहे. १०० टक्के निकालांच्या शाळांमध्ये सात खासगी अनुदानित व शासकीय अनुदानित आश्रमशाळांचाही समावेश आहे. यामध्ये गडचिरोली शहरातील दोन शाळांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ९१.५ टक्के निकाल भामरागड तालुक्याचा असून सर्वात कमी ८४.७ टक्के निकाल धानोरा तालुक्याचा आहे.पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६३.०७ टक्के४गडचिरोली जिल्ह्यातून १ हजार ११७ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार ११३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी सहा विद्यार्थी पहिल्या श्रेणीत, ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा निकाल ६३.०७ टक्के लागला आहे. निकालाच्या टक्केवारी मुलांची आघाडी४गडचिरोली जिल्ह्यातून १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ७ हजार १६८ मुले व ६ हजार ८६५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच मुलांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.२५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.३४ टक्के आहे. मुलींचे परीक्षेला बसण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढलेली आहे.