शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पहिल्याच पावसाळ्यात बंधारा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:36 IST

बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली.

ठळक मुद्देहुडूकदुम्मा येथील बंधारा । निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे चार महिन्यांपूर्वी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. सदर बंधारा पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरची तालुक्यात पड्यालजोग येथे तीन बंधारे, घुगवा येथे दोन, हेटाळकसात पाच, हुडूकदुम्मात दोन, खसोडाला, काडे येथे प्रत्येकी दोन असे एकूण १६ बंधारे मंजूर केले. १६ बंधारे कंत्राटदाराने स्वत: लेआऊट टाकून बांधले. त्यापैकी बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे १० टीसीएम क्षमतेचा बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. बंधारे बांधकाम सुरू असताना अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र बांधकामादरम्यान अभियंत्यांनी भेटच दिली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या परीने बंधारा बांधून पैसे उचलले. पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेला आहे. बंधाऱ्याचे दोन तुकडे पडले आहेत. यावरून बंधारे काम निकृष्ट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले होते. मात्र या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंत्राटदार व जलयुक्त शिवार अभियानाच्या अभियंत्यांचाच फायदा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.अभियंता व कंत्राटदारावर कारवाई कराबंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली. संपूर्ण बंधाऱ्याचे बांधकाम झाले तरी एकही अभियंता कामावर फिरकला नाही, अशी माहिती गावकऱ्यांनी लोकमतला दिली आहे. या बंधाऱ्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून बंधाऱ्याची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांकडून वसूल करावी, अशी मागणी आहे. याबाबत उपविभागीय अभियंता बरडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. कोरची तालुक्यातील इतर १६ ठिकाणच्या बंधाºयाचेही बांधकाम निकृष्ट झाले असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत