शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
4
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
5
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
6
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
7
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
8
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
9
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
10
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
11
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
12
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
13
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
14
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
15
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
16
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
17
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
18
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
19
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
20
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसाळ्यात बंधारा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:36 IST

बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली.

ठळक मुद्देहुडूकदुम्मा येथील बंधारा । निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे चार महिन्यांपूर्वी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. सदर बंधारा पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरची तालुक्यात पड्यालजोग येथे तीन बंधारे, घुगवा येथे दोन, हेटाळकसात पाच, हुडूकदुम्मात दोन, खसोडाला, काडे येथे प्रत्येकी दोन असे एकूण १६ बंधारे मंजूर केले. १६ बंधारे कंत्राटदाराने स्वत: लेआऊट टाकून बांधले. त्यापैकी बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे १० टीसीएम क्षमतेचा बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. बंधारे बांधकाम सुरू असताना अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र बांधकामादरम्यान अभियंत्यांनी भेटच दिली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या परीने बंधारा बांधून पैसे उचलले. पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेला आहे. बंधाऱ्याचे दोन तुकडे पडले आहेत. यावरून बंधारे काम निकृष्ट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले होते. मात्र या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंत्राटदार व जलयुक्त शिवार अभियानाच्या अभियंत्यांचाच फायदा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.अभियंता व कंत्राटदारावर कारवाई कराबंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली. संपूर्ण बंधाऱ्याचे बांधकाम झाले तरी एकही अभियंता कामावर फिरकला नाही, अशी माहिती गावकऱ्यांनी लोकमतला दिली आहे. या बंधाऱ्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून बंधाऱ्याची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांकडून वसूल करावी, अशी मागणी आहे. याबाबत उपविभागीय अभियंता बरडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. कोरची तालुक्यातील इतर १६ ठिकाणच्या बंधाºयाचेही बांधकाम निकृष्ट झाले असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत