शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमोपचार पेट्या गायब

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेटी व क्वाईन बॉक्स काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत

गडचिरोली : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेटी व क्वाईन बॉक्स काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत बहुतांश एसटीमधून सदर उपकरणे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे आकस्मिक संकटाच्या वेळी मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक बसमधील आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत.आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे हे परिवहन कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून संबंधीत कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. एसटी महामंडळाने सुरक्षित प्रवासाची जणू हमीच घेतली, अशा आविर्भावात प्रवाशांच्या सुरक्षेचा उदो उदो प्रारंभी केला जात होता. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान व उदासीन कारभारामुळे प्रवाशांची असुरक्षितता वाढली आहे. परिणामत: अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. दुर्दैवाने बसमधून प्रवास करतांना अपघात झालाच तर प्राथमिक उपचार म्हणून कशाचा वापर करायचा असा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे. अपघात प्रवाशी किरकोळ जखमी झाल्यावर जागीच प्राथमिक उपचार व्हावा, याकरिता डेटॉल, ड्रेसिंग आदी साहित्य असलेली पेटी बसगाडीत पूर्वी असायची. याबाबत परिवहन विभागाकडून राज्यातील सर्व आगारांना स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात चालणाऱ्या कोणत्याही एसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी तर दिसतच नाही. शिवाय आग प्रतिबंधक यंत्रणाही गायब झाल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली आगारातून सिरोंचा, भामरागड, कोरची, धानोरा यासारख्या दुर्गम भागात अनेक बसफेऱ्या होतात. या बसगाड्या जिल्ह्यात व जिल्हाबाहेरही प्रवाशांची ने-आण करतात. गडचिरोली आगारातील एसटी गाड्यांच्या देखभालीसाठी एक मुख्य वर्कशॉप आहे. एसटीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीचे विभागीय कार्यलय आहे. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवाशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला प्रथम पसंती देतात. प्रवाशांच्या सोयीनुसान नवनवीन गाड्या आणल्या जातात. प्रवासाला जाणाऱ्या प्रत्येक गाडीची पाहणी केली जाते. अशावेळी गाडीत प्रथमोपचार, अग्नीशमन यंत्रणा व त्यातील साहित्य आहेत की नाही याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून का होत नाही, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. बहुतांश एसटीतील क्वाईन बॉक्सही बेपत्ता झाले आहेत. आग प्रतिबंधक उपकरणे अनेक बसमध्ये लावण्यातही आले नव्हते. त्यामुळे सध्य:स्थितीतही अनेक बसेस साहित्यविनाच आहेत. विशेष सदर उपकरणे असल्याशिवाय आरटीओ कार्यालयाकडून वाहनांची पासिंग केली जात नाही. असे असताना वाहनांची पासिंग कशी काय केली जात आहे, हाही प्रश्न आहे. बसगाड्यांमधील प्रथमोपचार पेट्या व इतर साहित्य अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. (शहर प्रतिनिधी)