शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

गडचिरोली जिल्हयातील अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:20 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली.

ठळक मुद्देभरती रुग्णांची धावपळ वायरिंगसह लाखोंचे महागडे साहित्य जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे ५० लाखांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य जळून खाक झाले.विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटने ही आग लागली. ५० खाटांच्या या रुग्णालयात जवळपास ७० रुग्ण भरती होते. टेलिमेडिसीन रुममधील विद्युत तारांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रांनी आणि टाकीतील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.रुग्ण भरती असलेल्या दोन्ही वॉर्डमध्ये ही आग पसरली नाही. मात्र अंतर्गत भागात सर्वत्र धूर पसरल्याने भरती असलेल्या रुग्णांची तारांबळ उडाली. त्यांना दुसऱ्या एका वॉर्डमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. या आगीत विद्युत पुरवठ्याची वायरिंग जळाल्यामुळे रूग्णालयाचा विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसह शस्त्रक्रिया ठप्प राहण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी अहेरी नगर पंचायतची अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली. सात महिन्यांपूर्वीच नगर पंचायतला ८५ लाख रुपयांच्या खर्चातून अग्निशमन वाहन देण्यात आले. मात्र प्रशिक्षित कर्मचारीच नसल्यामुळे हे अग्निशमन वाहन शोभेचे ठरले. ही आग विझविण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होऊ न शकल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.रुग्णालयाची वायरिंग खूप जुनी आहे. मशिनरी आधुनिक लागल्या असल्यामुळे त्याअनुषंगाने वायरिंगमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. वायरिंग दुरूस्तीसाठी यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निधीची मागणी केली आहे. मात्र निधी मिळाला नसल्यामुळे दुरूस्ती होऊ शकली नाही.- डॉ.कन्ना मडावी, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

टॅग्स :fireआग