शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गडचिरोलीतील अहेरीत लागलेल्या आगीत २५ एकर तुरीचे शेत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 15:11 IST

येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या तुरीच्या पिकांना शनिवारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर मधील तुरीचे पीक जळून खाक झाले.

ठळक मुद्देलाखो रु पयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:- येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या तुरीच्या पिकांना शनिवारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर मधील तुरीचे पीक जळून खाक झाले.सविस्तर वृत्त असे की शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीचे महागाव लगत २५ एकर शेत असून या शेतात त्यांनी तुरीचे पीक घेतले होते. यात १२ एकरातील पीक घेऊन ते एका ठिकाणी साठवून ठेवले होते. तसेच उर्वरित १२ एकरात तुरीचे पीक लावून होते. मात्र शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान शेतातील एका कोपर्यातून आगीचे धूर निघताना दिसले. ही बाब समजताच शंकर गोंगले व तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष संजय अलोने यांनी शेताकडे धाव घेतली. संजय अलोने यांनी त्वरित अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी डॉ कुलभूषण रामटके यांना याची माहिती दिली. लगेच अहेरी नगर पंचायतचे अग्नीशामक वाहन निघाले मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले व संपूर्ण पीक यात जळून खाक झाले. यात शंकर गोंगले यांचे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले. तलाठी राजेंद्र आव्हाड यांनी पंचनामा केला.ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी मुद्दाम लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे.

टॅग्स :fireआग