शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

२८ प्रकरणात ६० लाख ४२ हजाराचा दंड वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:32 IST

चामोशी- तालुक्यातील विविध नदीघाटातून ,मुरुम खाणीतून गेल्या वर्षभरात रेतीची, मुरुम, दगडाचे ट्रॅक्टर , हायवाद्वारा अवैधपणे चोरी करून वाहतूक ...

चामोशी- तालुक्यातील विविध नदीघाटातून ,मुरुम खाणीतून गेल्या वर्षभरात रेतीची, मुरुम, दगडाचे ट्रॅक्टर , हायवाद्वारा अवैधपणे चोरी करून वाहतूक करणाऱ्या २८ प्रकरणात तालुका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. यात रेती तस्करांकडून ६० लाख ४२ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे.

मागील वर्षीपासून रेतीघाटाचे लिलाव बंद असल्याने रेती चोरीला चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. म्हणून रात्रीच्या वेळेस रेतीची चोरी करणे सुरू केले. जवळील अनेक नदी घाटात रात्रीच्या वेळी रेती चोरांचा धुमाकूळ सुरू असतो. रात्री नदी घाटातून १२ वाजतापासून तर पहाटेपर्यन्त रेतीची अवैध वाहतुक (विनापरवाना )चोरी सुरू असते . काेणत्याही अधिकाऱ्यांची गाडी येऊ नये म्हणून रात्री रेती तस्करांकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते अशीही माहिती आहे. तरीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती तस्कराच्या मुसक्या आवळणे सुरू केले. चामोर्शीच्या महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या जवळपास रेतीच्या २३ प्रकरणात ५१ लाख ५० हजार ६०० रुपये , मुरूमाच्या ४ प्रकरणात ६ लाख ८६ हजार रुपये , दगडाच्या एका प्रकरणात १ लाख ५ हजार ४०० रूपये आहे. सर्व मिळुन एकूण ६० लाख ४२ हजार रुपये २८ प्रकरणात दंड ठोकून ट्रॅक्टरवर व इतर वाहनावर कारवाई केली आहे. लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या वर्षभराच्या काळात विनापरवाना वाहतूक करणाऱ्या अवैध रेती, मुरुम, दगड चोरणाऱ्या २८ प्रकरणात ट्रॅक्टर व इतर वाहनावर दंड व रायल्टीची रक्कम रेती तस्करकडून ६० लाख ४२ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. रेतीची चोरी करताना ट्रॅक्टर सापडल्यास १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. महसूल विभागाच्या कारवाया सुरू असल्यातरी रात्रीच्या वेळेस रेतीची चोरी सुरूच आहे. चामोर्शी तालुक्याच्या सिमेवरून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील गणपूर, दोटकुली, बोरघाट , जयरामपूर, वाघोली , मोहुली , तळोधी मोकासा, कुरुळ आदी गावातील रेती घाटाचा लिलाव झाला नाही . त्यामुळे विविध बांधकामासाठी रेती चोरून विक्री करण्याचा धंदा सुरू केला आहे . त्यामुळ रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे .