शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निलगाय व माकडाच्या हल्ल्यात जखमी झाल्यास अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 11:54 IST

वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) यांचा समावेश करण्यात आला असून या दोन वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमींना अर्थसहाय्य देण्याची तरतूद शासनाने केली आहे.

ठळक मुद्देशासनाची नव्याने तरतूद मृत पावल्यास १५ लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) यांचा समावेश करण्यात आला असून या दोन वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमींना अर्थसहाय्य देण्याची तरतूद शासनाने केली आहे.वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे या वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत पावल्यास आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आधीच होती. या वन्यजीवांसोबतच निलगाय व माकडाच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटनाही घडत आहेत. मात्र शासन निर्णयात तरतूद नसल्याने माकड किंवा निलगायीने हल्ला करून जखमी केले तरी मदत मिळत नव्हती. या जखमींनाही मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे.त्यानुसार व्यक्ती मृत झाल्यास १५ लाख रुपये, गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये यापैकी कमी असणारी किंमत दिली जाईल. तसेच जखमी असलेल्या व्यक्तीलाही आवश्यक ती मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव